… तर विधानसभेच्‍या २८८ जागा लढवणार : जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

… तर विधानसभेच्‍या २८८ जागा लढवणार : जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आमची लढाई मराठा आरक्षणासाठी सुरु आहे. आम्‍ही आमच्‍या मागणीवर ठाम आहाेत. मला राजकारणात जायच नाही, माझ ध्येय मराठा लोकांना आरक्षण मिळवून देणे आहे. मात्र आताही राज्‍य सरकारने मराठा आरक्षण प्रश्‍नाबाबत ठाेस निर्णय घेतला नाही तर  आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्‍ट्रातील सर्व २८८ मतदारसंघात उमेदवार उभे केले जातील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ते अंतरवाली सराटीमधून मराठा आंदोलन स्थळावरुन माध्‍यमांशी बोलत होते. Manoj Jarange-Patil 
या वेळी जरांगे-पाटील म्‍हणाले की, मला राजकारणात जायचे नाही. माझ्‍या समाजालाही राजकारणात जायचे नाही. माझे ध्‍येय हे मराठा आरक्षण आहे. सरकारने मराठा आरक्षण प्रश्‍नी तत्‍काळ निर्णय घ्‍यावा. सरकारने या प्रश्‍नी गांभीर्याने पाहण्‍याची गरज आहे.