मध्यप्रदेशमधील राजगढ जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशमधील राजगढ जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातून वारातीला घेऊन येणार ट्रॅक्टर ट्रॉली सहित रविवार रात्री मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यामध्ये  पिपलौदी जोड जवळ दारी मध्ये पडून पालटला. या अपघातामध्ये तीन मुले आणि तीन महिलांसमवेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातून वारातीला घेऊन परतणाऱ्या  ट्रकातर ट्रॉलीला अपघात झाला आहे. रविवारी रात्री मध्यप्रदेशच्या  राजगढ जिल्ह्यामध्ये पिपलौदी जोड जवळ दरीमध्ये कोसळले. या अपघातामध्ये तीन मुलं आणि तीन महिलांसहित 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 40 लोक जखमी असल्याची माहिती मिळत आहे. तर 30 लोक राजगढ जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

हा अपघात रात्री 9 वाजता राजस्थान-मध्यप्रदेशच्या सीमेवर पिपलौदी जोड वर घडला. ट्रॅकटरमध्ये राजस्थानचे इकलेराजवळ स्थित मोतीपुरा गावातून तातूडिय़ा कुटुंब वरात घेऊन राजगढ जवळ देहरीनाथ पंचायतचे गांव कमालपुर येथे येत होती. खामखेडा पासून दूर पिपलौदी वळणावर ट्रॅकटर दरीमध्ये कोसळले.सांगितले जाते आहे की, ट्रॅकटर -ट्रॉली मध्ये 50 पेक्षा जास्त लोक होते. जखमी युवकाने सांगितले की,  ड्राइवर दारूच्या नशेमध्ये होता. यामुळे वळणावर त्याचे नियंत्रण सुटले. 

 

राजगढ कलेक्टर हर्ष दीक्षित आणि एसपी आदित्य मिश्रा घटनास्थळी पोहचले. व त्यांनी पाहणी केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Edited By- Dhanashri Naik   

Go to Source