हिंगोली: माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : आपल्या स्पष्ट वक्‍तेपणासाठी ओळखल्या जाणार्‍या फायर ब्रॅन्ड नेत्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह हदगाव विधानसभा संयोजकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्‍का बसला असून त्या आता नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. कोण आहेत सुर्यकांता पाटील? 1980 ते 1985 …

हिंगोली: माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी

हिंगोली: Bharat Live News Media वृत्तसेवा : आपल्या स्पष्ट वक्‍तेपणासाठी ओळखल्या जाणार्‍या फायर ब्रॅन्ड नेत्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह हदगाव विधानसभा संयोजकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्‍का बसला असून त्या आता नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
कोण आहेत सुर्यकांता पाटील?

1980 ते 1985 या कालावधीत हदगाव विधानसभेच्या काँग्रेसच्या आमदार
1986 ते 1991 या कालावधीत काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य
1991 ते 1996 मध्ये नांदेड लोकसभा निवडणुकीत विजय
केंद्रामध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली

माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांनी 1980 ते 1985 या कालावधीत हदगाव विधानसभेच्या काँग्रेसच्या आमदार म्हणून काम पाहिले. त्यानंतर सन 1986 ते 1991 या कालावधीत काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य होत्या. तसेच 1991 ते 1996 मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला. काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादीने 2004 मध्ये हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता. केंद्रामध्ये त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले होते.
2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश
दरम्यान, सन 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता. मागील दहा वर्षापासून त्या भाजपामध्ये होत्या. भाजपामध्ये 10 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी नुकताच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठविला आहे. मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या सोबत गेल्या 10 वर्षात खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमीटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कोणतीही कटुता मनात न ठेवता राजीनामा देत आहे तो स्वीकारावा हि नम्र विनंती असे या राजीनामा पत्रात नमुद केले आहे.
दरम्यान, माजी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला नांदेड व हिंगोली जिल्हयात धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात माजीमंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजीनामा दिल्या असल्याचे सांगत पुढील भुमीकेबाबत वेट अ‍ॅण्ड वॉच असे स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वीच केली होती चूक मान्य
मागील काही महिन्यांपासून माजी मंत्री सुर्यकांता पाटील या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी शरद पवार यांना सोडल्याची चुक मान्य केली. शरद पवारांना सोडायला न पाहिजे होते असे देखील त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी थेट राजीनामा दिला. आता त्या पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार की राजकीय कारकिर्दीला विराम देणार याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा 

हिंगोली : उगवलेल्या पिकांना वरुणराजाची प्रतीक्षा
हिंगोली : शिंदेवाडी येथे घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
हिंगोली : हळदीच्या बेण्याला डिमांड; दर पोहोचले 5 हजारांवर