Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : NEET-UG परीक्षेतील कथित गैरप्रकार प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी रात्री उशिरा लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. लातूर येथील सरकारी शाळेत शिकवणाऱ्या संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखान पठाण अशी एटीएसच्या नांदेड युनिटच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या शिक्षकांची नावे आहेत, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.
आम्ही पारदर्शक आणि विनात्रुटी परीक्षेसाठी कटीबद्ध आहोत. परीक्षा सुधारणांबाबत एक पॅनल तयार करण्यात आले आहे, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली असून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.
NEET-UG परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांबद्दल आणि 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्क्सबद्दल विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. नंतर ग्रेस गुण काढून टाकण्यात आले. तसेच या विद्यार्थ्यांना पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे.
NEET पेपर फुटी प्रकरण : ‘एटीएस’ने घेतले दोन शिक्षकांना ताब्यात