काँग्रेस मुख्यालयातही विजयाची तयारी: मिठाईची ऑर्डर
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेसला असल्याने दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातही विजयोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, तरीही काँग्रेसला विजयाची खात्री आहे. विजय साजरा करण्यासाठी काँग्रेस
मुख्यालयात वातानुकुलित मंडप उभारण्यात आला आहे. कार्यकर्त्यांचे तोंड गोड करण्यासाठी मिठाईची ऑर्डर देण्यात आली आहे.
हेही वाचा
Lok Sabha Election Result : भाजप मुख्यालयात जल्लोषाची तयारी, बुंदीचे लाडूही वळून तयार
Southwest Monsoon | मान्सूनची वेगाने वाटचाल दक्षिणेतील ‘या’ राज्यात दाखल
Delhi-Mumbai Akasa Air flight | पुन्हा ‘बॉम्ब’ची धमकी, ‘आकासा’ने विमान अहमदाबादकडे वळवले