मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर अन्याय होतोय : शरद पवार

मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर अन्याय होतोय : शरद पवार

राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्रातील शेती आणि उद्योग वाढण्याची, तरुणांना अधिक रोजगार उपलब्ध करून देण्याची चिंता नसून, राज्यातील उद्योग गुजरातमध्ये कसे जातील याचीच अधिक चिंता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि आशीर्वादाने राज्यातील उद्योगधंदे हिसकावून महाराष्ट्रावर अन्याय केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली.मोदी हुकूमशाहीकडे पावले टाकत आहेत आणि हे लोकशाही आणि तुमच्या मूलभूत अधिकारांवर आलेले संकट असल्याने ते थांबवावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ कांजूरमार्ग येथे आयोजित प्रचार सभेत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत, खासदार चंद्रकांत हंडोरे उपस्थित होते. हीच निवडणूक लोकशाहीचे भवितव्य ठरवणार आहे.जगातील लोकशाही देशांमध्ये भारत अव्वल आहे आणि ही लोकशाही संकटात गेल्यास जगातील लोकशाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच अमेरिकेसह जगातील अनेक लोकशाहीवादी देशांना भारतातील लोकशाहीचे काय होत आहे, याची उत्सुकता आणि चिंता वाटत आहे. या निवडणुकीकडे आपले लक्ष असल्याचे स्पष्ट करून पवार म्हणाले, आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी भूमिका घेतली आहे. लोकशाही टिकली पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत.मात्र, गेल्या 10 वर्षांत मोदींनी याउलट कारभार केला आहे. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, पण आज देशातील बेरोजगारीचा दर 87 टक्के आहे. याचा अर्थ मोदी बोलतात एक आणि करतात एकच. ते कधीच दिलेला शब्द पाळत नाहीत, असा आरोपही पवार यांनी केला. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची निर्मिती एकाच वेळी झाली असली तरी या राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताला प्राधान्य देऊन कृषी, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात राज्याचा नावलौकिक वाढवला. मात्र राज्याचे हित जपण्याकडे सध्याचे सरकारचे लक्ष नाही. राज्यातील उद्योग गुजरातमध्ये कसे जातील याचीच त्यांना जास्त चिंता आहे, असा आरोप पवार यांनी केला.हेही वाचामनसे अध्यक्ष राज ठाकरे- पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर
बोरिवली ते कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूक सेवा उभारणार : पीयूष गोयल

Go to Source