‘मालदीवमधून लष्कर मागे घ्या’; मालदिव सरकारने भारताला दिली 15 दिवसांची डेडलाईन
मालदिव आणि भारत यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, मालदिवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी रविवारी पुन्हा एकदा ‘इंडिया आउट’चा नारा दिला आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घ्यावे या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.