भारतीय युवा संघाचे लक्ष उपांत्य फेरीवर
वृत्तसंस्था /ब्लोमफौंटन (द. आफ्रिका)
आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत आपली विजयी घोडदौड कायम राखणाऱ्या भारतीय संघाचे लक्ष आता उपांत्य फेरीवर राहिल. या स्पर्धेत शुक्रवारी भारत आणि नेपाळ यांच्यातील सुपर सिक्समधील शेवटची लढत होत आहे. या सामन्याला दुपारी 1.30 वाजता प्रारंभ होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे प्रक्षेपण होईल. सुपर सिक्स फेरीमध्ये दोन गट असून प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. गट 1 मध्ये भारतीय युवा संघ +3.32 धाव सरासरीसह 6 गुणासह पहिल्या स्थानावर असून पाकचा संघ या गटात +1.06 धाव सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहे. उदय सहारनच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला भक्कम आणि दमदार प्रारंभ करताना आतापर्यंत सलग चार सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. भारतीय युवा संघाने या स्पर्धेत तीन सामने 200 धावांपेक्षा अधिक फरकाने जिंकले आहेत. भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिकच बळावला असून आता यापुढील सामने अशाच प्रकारे जिंकून अंतिम फेरी गाठण्यासाठी कर्णधार सहारन सज्ज झाला आहे.
शुक्रवारच्या सामन्यात भारताच्या तुलनेत नेपाळचा संघ भक्कम निश्चितच नसल्याचे जाणवते. गट 1 मध्ये भारतीय संघाने प्राथमिक फेरीत आपले सलग तीन सामने जिंकून 6 गुण नोंदवले तर नेपाळला अद्याप आपला पहिला विजयी मिळविता आला नाही. मुंबईच्या रणजी संघातील प्रमुख फलंदाज सरफराज खान याचा लहान भाऊ मुशीर खान याने भारतीय युवा संघातून आतापर्यंत दमदार फलंदाजी करताना 4 सामन्यात एकूण 325 धावा जमवल्या आहेत. त्याने या स्पर्धेत 2 शतके झळकवली आहेत. अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शतक झळकवले होते. तसेच गोलंदाजीतही उपयुक्त कामगिरी केली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मुशीर खानने 126 चेंडूत 134 धावा तसेच सौम्या कुमार पांडेने 4 गडी बाद केल्याने भारताने सुपर सिक्स फेरीतील आपला पहिला सामना 214 धावांच्या फरकाने जिंकला होता. सौम्याकुमार पांडेने आतापर्यंत या स्पर्धेत गोलंदाजीत आघाडीच स्थान मिळवताना त्याने सर्वाधिक म्हणजे 12 बळी घेतले आहेत. गोलंदाजांच्या यादीमध्ये पाकचा उबेद शहा आणि द. आफ्रिकेचा मोपेका यांची कामगिरी पांडेप्रमाणेच दर्जेदार झाली आहे. भारतीय संघाची फलंदाजी सध्या तरी भक्कम वाटत असून कर्णधार सारन, यष्टीरक्षक आणि फलंदाज अरवली अविनाश तसेच अष्टपेलू अर्शिन कुलकर्णी यांच्याकडून फलंदाजीत सातत्य राखले जात आहे. सलामीचा फलंदाज आदर्श सिंगने या स्पर्धेत आतापर्यंत दोन अर्धशतके नांदवली आहेत. भारतीय संघातील डावखुरा मध्यमगती गोलंदाज नमन तिवारी पॉवर प्लेमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्यात यशस्वी ठरत आहे.
Home महत्वाची बातमी भारतीय युवा संघाचे लक्ष उपांत्य फेरीवर
भारतीय युवा संघाचे लक्ष उपांत्य फेरीवर
वृत्तसंस्था /ब्लोमफौंटन (द. आफ्रिका) आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत आपली विजयी घोडदौड कायम राखणाऱ्या भारतीय संघाचे लक्ष आता उपांत्य फेरीवर राहिल. या स्पर्धेत शुक्रवारी भारत आणि नेपाळ यांच्यातील सुपर सिक्समधील शेवटची लढत होत आहे. या सामन्याला दुपारी 1.30 वाजता प्रारंभ होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे प्रक्षेपण होईल. सुपर सिक्स फेरीमध्ये दोन […]