ठाणे: थकीत पाणी बिलाचा आकडा 100 कोटींपेक्षा जास्त
ठाणे महानगरपालिकेने (thane municipal corporation) पाणी बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेल्या कारवाईत 100 कोटी रुपयांची रक्कम वसूल केली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 कोटी रुपये जास्त वसूल करण्यात आले आहेत. तसेच, संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 9603 नळाचे कनेक्शन (water connection) काढून टाकण्यात आले आहेत. तसेच 411 मोटार पंप जप्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 547 पंप रूम सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, 9923 थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.महानगरपालिकेचे पाणी बिल सुमारे 225 कोटी रुपये आहे. त्यापैकी 76 कोटी रुपये थकबाकी आहे आणि चालू वर्षाचे बिल 148 कोटी रुपये आहे. आतापर्यंत 106 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती उपनगरीय अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळाचे कनेक्शन तोडण्याची आणि पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ठाणे (thane) महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी या संदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी हे या कारवाईचा सतत आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले. पाणी बिल (water bill) थकबाकी वसूल करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये नळ कनेक्शन तोडण्यात येत आहेत, मोटार पंप जप्त केले जात आहेत, मीटर रूम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिल न भरता तुटलेले नळ कनेक्शन परस्पर पुन्हा चालू केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.प्रभाग समितीमध्ये पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली पाणी बिल वसूलीची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच त्यांना कारवाईत कोणतेही नुकसान करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी बिल वसुलीत सहभागी असलेल्या अभियंते आणि लिपिकांवर शिस्तभंगाची कारवाई आणि वार्षिक वेतनवाढ रोखण्याचाही प्रस्ताव आहे. तथापि, नागरिकांनी वेळेवर पाणी बिल भरावे आणि थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेला सहकार्य करावे. अन्यथा नळ कनेक्शन तोडले जाईल असे उपनगरीय अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.चालू वर्षाच्या मागणीसह महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती वापरासाठी नळ कनेक्शनची देणी पूर्ण भरल्यास प्रशासकीय शुल्कात 100 टक्के सूट लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन टीएमसीच्या वतीने करण्यात आले आहे. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत लागू असेल. या योजनेचा लाभ घेऊन, नागरिकांना थकीत आणि चालू पाणी बिलाची रक्कम पूर्णपणे भरून प्रशासकीय शुल्कात 100 टक्के सूट योजनेचा लाभ घेता येईल. या धोरणात्मक निर्णयापूर्वी पाणी पुरवठा शुल्क जमा केलेल्या घरगुती पाणी बिल धारकांना ही सवलत योजना लागू होणार नाही. तसेच, ही योजना व्यवसायिक स्वरुपाच्या धारकांना लागू होणार नाही.हेही वाचाबेकरीतील भट्ट्या रुपांतरीत करणे अशक्यलवकरच रविंद्र नाट्य मंदीरचा पडदा उघडणार
Home महत्वाची बातमी ठाणे: थकीत पाणी बिलाचा आकडा 100 कोटींपेक्षा जास्त
ठाणे: थकीत पाणी बिलाचा आकडा 100 कोटींपेक्षा जास्त
ठाणे महानगरपालिकेने (thane municipal corporation) पाणी बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेल्या कारवाईत 100 कोटी रुपयांची रक्कम वसूल केली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 कोटी रुपये जास्त वसूल करण्यात आले आहेत.
तसेच, संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 9603 नळाचे कनेक्शन (water connection) काढून टाकण्यात आले आहेत. तसेच 411 मोटार पंप जप्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 547 पंप रूम सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, 9923 थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेचे पाणी बिल सुमारे 225 कोटी रुपये आहे. त्यापैकी 76 कोटी रुपये थकबाकी आहे आणि चालू वर्षाचे बिल 148 कोटी रुपये आहे. आतापर्यंत 106 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती उपनगरीय अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे.
पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळाचे कनेक्शन तोडण्याची आणि पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ठाणे (thane) महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी या संदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी हे या कारवाईचा सतत आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले.
पाणी बिल (water bill) थकबाकी वसूल करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये नळ कनेक्शन तोडण्यात येत आहेत, मोटार पंप जप्त केले जात आहेत, मीटर रूम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिल न भरता तुटलेले नळ कनेक्शन परस्पर पुन्हा चालू केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रभाग समितीमध्ये पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली पाणी बिल वसूलीची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच त्यांना कारवाईत कोणतेही नुकसान करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पाणी बिल वसुलीत सहभागी असलेल्या अभियंते आणि लिपिकांवर शिस्तभंगाची कारवाई आणि वार्षिक वेतनवाढ रोखण्याचाही प्रस्ताव आहे. तथापि, नागरिकांनी वेळेवर पाणी बिल भरावे आणि थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेला सहकार्य करावे. अन्यथा नळ कनेक्शन तोडले जाईल असे उपनगरीय अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
चालू वर्षाच्या मागणीसह महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती वापरासाठी नळ कनेक्शनची देणी पूर्ण भरल्यास प्रशासकीय शुल्कात 100 टक्के सूट लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन टीएमसीच्या वतीने करण्यात आले आहे.
ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत लागू असेल. या योजनेचा लाभ घेऊन, नागरिकांना थकीत आणि चालू पाणी बिलाची रक्कम पूर्णपणे भरून प्रशासकीय शुल्कात 100 टक्के सूट योजनेचा लाभ घेता येईल.
या धोरणात्मक निर्णयापूर्वी पाणी पुरवठा शुल्क जमा केलेल्या घरगुती पाणी बिल धारकांना ही सवलत योजना लागू होणार नाही. तसेच, ही योजना व्यवसायिक स्वरुपाच्या धारकांना लागू होणार नाही.हेही वाचा
बेकरीतील भट्ट्या रुपांतरीत करणे अशक्य
लवकरच रविंद्र नाट्य मंदीरचा पडदा उघडणार