गृहलक्ष्मीतील त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा शिबिर घ्या

योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची मागणी बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी तीन दिवसीय शिबिर पार पडले. ग्रामीण भागातील ग्राम पंचायत पातळीवर गृहलक्ष्मी अदालत भरविण्यात आली होती. यामध्ये महिलांचा प्रतिसाद चांगला मिळाला. त्यामुळे अनेकांच्या गृहलक्ष्मीमधील त्रुटी दूर झाल्या आहेत. त्यामुळे गृहलक्ष्मी योजनेकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक दोन हजार रुपये […]

गृहलक्ष्मीतील त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा शिबिर घ्या

योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची मागणी
बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी तीन दिवसीय शिबिर पार पडले. ग्रामीण भागातील ग्राम पंचायत पातळीवर गृहलक्ष्मी अदालत भरविण्यात आली होती. यामध्ये महिलांचा प्रतिसाद चांगला मिळाला. त्यामुळे अनेकांच्या गृहलक्ष्मीमधील त्रुटी दूर झाल्या आहेत. त्यामुळे गृहलक्ष्मी योजनेकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक दोन हजार रुपये दिले जातात. मात्र, काही लाभार्थ्यांच्या त्रुटी असल्याने त्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागले होते. दरम्यान लाभार्थ्यांकडून योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यासाठी राज्य सरकारने तीन दिवसीय गृहलक्ष्मी अदालत भरविली होती. मात्र याबाबत म्हणावी तशी जागृती नसल्याने काही लाभार्थी यापासून वंचित राहिले. त्यामुळे पुन्हा गृहलक्ष्मीतील त्रुटी दूर करण्यासाठी अदालत (शिबिर) भरवावी, अशी मागणीही लाभार्थ्यांतून होत आहे. काँग्रेस सरकारने सत्तेत आल्यानंतर पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये शक्ती, गृहज्योती, गृहलक्ष्मी, अन्नभाग्य आणि युवानिधी योजनेचा समावेश आहे. यापैकी गृहलक्ष्मी योजनेसाठी जिल्ह्यातून 11 लाख लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, काही लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित रहावे लागत होते. काहींचे बँक खाते निष्क्रिय तर काहींच्या अर्जांमध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे त्यांना योजनेपासून दूर रहावे लागत होते. यासाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या लाभार्थ्यांच्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही काही लाभार्थ्यांच्या अडचणी कायम आहेत. यासाठी पुन्हा गृहलक्ष्मीतील त्रुटी दूर करण्यासाठी अदालत भरवावी, अशी मागणी होत आहे.
समस्यांचे निवारण केले जाणार
सर्व लाभार्थी महिलांना गृहलक्ष्मीचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या तीन दिवसीय शिबिर पार पडले. मात्र, पुन्हा जानेवारीमध्ये योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी शिबिर भरविले जाणार आहे. शिवाय यावेळी शहरी भागातील देखील समस्यांचे निवारण केले जाणार आहे.
– रेवती होसमठ (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण खाते)