मुंबई फिरून गावाकडे जाताना ५ मित्रांवर काळाची झडप!  भिगवण जवळ मोठा अपघात  

भिगवण :- वार्ताहर पुणे – सोलापूर महामार्गावर डाळज नं 1 (ता. इंदापूर) ग्रामपंचायतच्या हद्दीत चारचाकी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 02) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती मिळतअसून […]

मुंबई फिरून गावाकडे जाताना ५ मित्रांवर काळाची झडप!  भिगवण जवळ मोठा अपघात  

भिगवण :- वार्ताहर
पुणे – सोलापूर महामार्गावर डाळज नं 1 (ता. इंदापूर) ग्रामपंचायतच्या हद्दीत चारचाकी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 02) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती मिळतअसून हा अपघात एवढा भीषण होता की, चारचाकी गाडीने तीन चार पलट्या मारल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली.
रफिक कुरेशी (वय 34), इरफान पटेल (वय 24), मेहबूब कुरेशी (वय- 24) फिरोज कुरेशी (वय 28) फिरोज कुरेशी (वय 27) (सर्व रा. नारायनखेड, ता, जि-मेडक, तेलंगणा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत. तर सय्यद इस्माईल अमीर (वय 23) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती भिगवण या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील नारायनखेड(जिल्हा-मेडक) या गावातील सहा तरुण मुंबईला फिरायला बलेनो गाडी मधून फिरायला गेले होते. मुंबई फिरून झाल्यानंतर परत आपल्या नारायणखेड या गावी पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून परत निघाले होते. पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून परत चालले असताना दुपारी चालू आलेल्या जोरदार पाऊसामुळे डाळज नंबर तीन च्या हद्दीतील सुजाता पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्यालगत साचलेल्या पाण्याच्या खड्डयाचा अंदाज न आल्याने वेगाने असणारी बलेनो कार खड्ड्यात जोरात आदळली.
कार खड्ड्यात आदळल्याने चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले व गाडीने तब्बल तीन चार पलट्या मारल्या. व यामध्ये गाडीत असलेले पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकावर भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान,अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची सेवा ॲम्बुलन्सचे मालक केतन वाघ यांनी सर्व जखमींना भिगवण या ठिकाणी पुढील उपचारासाठी भिगवण आयसीयु या दवाखान्यात आणण्यात आले परंतु त्यातील पाच तरुणांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या तरुणावरती पुढील उपचार चालू करण्यात आले.