Nashik News | आता बेशिस्त वाहनचालकांना बसणार ई-चलनाचा दंड
नाशिक शहरात बेशिस्त वाहनचालकांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध सिग्नलवर फेरीवाले आणि भिकाऱ्यांचे अतिक्रमण, तसेच रिक्षाचालकांची मुजोरी यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आणि ६० वॉर्डन नियुक्त करून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.