ठाणेकरांनो, लक्ष द्या! 30 जानेवारी रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा–मानपाडा आणि वागळे भागांतील नागरिकांना शुक्रवार, 30 जानेवारी 2026 रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तातडीच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र (HSR जलसाठा) येथे पाइपलाइन क्रमांक 1, 2 आणि 3 चे उन्नतीकरण तसेच तातडीची दुरुस्ती व देखभाल केली जाणार आहे. त्यामुळे गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार, 30 जानेवारी 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या कालावधीत खालील भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे:दिवा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रमुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31 (काही भाग वगळता)वागळे प्रभाग समिती: रुपादेवी पाडा, किसान नगर क्रमांक 2, नेहरू नगरमानपाडा प्रभाग समिती: कोळशेत खालचा गावपाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.हेही वाचा मुंबईतील ‘या’ भागात 7 फेब्रुवारीपर्यंत 10% पाणीकपात

ठाणेकरांनो, लक्ष द्या! 30 जानेवारी रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा–मानपाडा आणि वागळे भागांतील नागरिकांना शुक्रवार, 30 जानेवारी 2026 रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तातडीच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र (HSR जलसाठा) येथे पाइपलाइन क्रमांक 1, 2 आणि 3 चे उन्नतीकरण तसेच तातडीची दुरुस्ती व देखभाल केली जाणार आहे. त्यामुळे गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार, 30 जानेवारी 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.या कालावधीत खालील भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे:दिवा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रमुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31 (काही भाग वगळता)वागळे प्रभाग समिती: रुपादेवी पाडा, किसान नगर क्रमांक 2, नेहरू नगरमानपाडा प्रभाग समिती: कोळशेत खालचा गावपाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.हेही वाचामुंबईतील ‘या’ भागात 7 फेब्रुवारीपर्यंत 10% पाणीकपात

Go to Source