वृक्ष लागवड केल्याचा फोटो द्या, आणि विवाह दाखला घ्या

निरवडे ग्रामपंचायतीचे “ फर्मान “ न्हावेली / वार्ताहर निरवडे ग्रामपंचायतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.गावातील नव्याने विवाह केलेल्या दांपत्याने विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या जागेत नवीन वृक्ष लागवड करुन फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दिल्याशिवाय विवाह नोंदणीचा दाखला देण्यात येणार नाही,तसा ठराव झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.हा ठराव घेणारी निरवडे ग्रामपंचायत तालुक्यातील पहिली […]

वृक्ष लागवड केल्याचा फोटो द्या, आणि विवाह दाखला घ्या

निरवडे ग्रामपंचायतीचे “ फर्मान “
न्हावेली / वार्ताहर
निरवडे ग्रामपंचायतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.गावातील नव्याने विवाह केलेल्या दांपत्याने विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या जागेत नवीन वृक्ष लागवड करुन फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दिल्याशिवाय विवाह नोंदणीचा दाखला देण्यात येणार नाही,तसा ठराव झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.हा ठराव घेणारी निरवडे ग्रामपंचायत तालुक्यातील पहिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरी आहे.गावातील नव्याने विवाह केलेल्या दाम्पत्याने विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या घरासमोर नवीन वृक्ष लागवड करुन फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखविल्यानंतरच विवाह नोंदणीचा दाखला देण्याचा ठराव घेत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.हवा शुद्ध करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे आवश्यक आहे.झाडे आणि वनस्पती मानवी आरोग्यासोबतच पर्यावरणही निरोगी ठेवतात ते हवामानावरही नियत्रंण ठेवतात.अधिक झाडे लावल्याने वातावरणातील ॲाक्सिजनचे प्रमाण योग्य राहते.हीच बाब लक्षात घेत तालुक्यातील निरवडे येथील सरपंच सुहानी गावडे यांनी मांडलेल्या संकल्पनेतून नवदाम्पत्याने घरासमोर एक झाड लावून झाडाचा फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखवल्यानंतर विवाह प्रमाणपत्र देण्याचा ठराव घेण्यात आला.गावातील ग्रामस्थांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे.यावेळी सरपंच सुहानी गावडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर ग्रामसेवक सुनिता कदम ग्रामपंचाय सदस्य अंगारिका गावडे आदेश जाधव आनंदी पवार तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष महेंद्र गावडे सुहास गावडे बाबल सावळ निधी शिरोडकर ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.गावामध्ये वृक्षारोपण होऊन चांगले वातावरण निर्माण होईल.तसेच आरोग्यदायक वातावरण राहिल.उन्हाळ्यात उन्हाचा त्रास लोकांना जाणवणार नाही यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.त्यामुळेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ‘ एक झाड लावा आणि त्याचा फोटो ग्रामपंचायतीला दाखवा ‘ असा निर्णय लागू केला आहे त्याची अमंलबजावणीही करण्यात येणार आहे.