बोरिवली ते गोराई दरम्यान नवीन जेट्टी
बोरिवली (borivali) आणि गोराई (gorai) दरम्यानचा जलप्रवास लवकरच अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. सध्या या मार्गावर एक ते दीड तासांचा वेळ लागत असला, तरी नव्या रो-रो (Ro-Ro) जेट्टीमुळे हा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. तसेच आता जेट्टीच्या कामाला वेग मिळाला असून प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे.बोरिवली ते गोराई या मार्गावर रोजगार, दैनंदिन प्रवास आणि पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात. दिवसभर फेऱ्या सुरू असतात आणि भाडे केवळ 10 ते 15 रुपये असल्याने गोराई बीचवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा स्वस्त पर्याय ठरतो. मात्र प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात वेळ खर्च होतो. ही अडचण दूर करण्यासाठी रो-रो फेरीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.जेट्टी (jetty) सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि वाहनांसाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यटकांची संख्या वाढल्याने स्थानिक व्यवसाय आणि रोजगारालाही चालना मिळेल, अशी माहिती गोराई गावठाण पंचायतीचे सदस्य रॉसी डिसोझा यांनी दिली.दरम्यान, काही स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंचायत सदस्य रॉयस्टन गोडिन्हो यांनी गोराईतील अरुंद आणि अपघातप्रवण रस्त्यांकडे लक्ष वेधले आहे. “गोराईला याचा नेमका फायदा कसा होईल, ही आमची मुख्य चिंता आहे. येथील रस्ते आधीच खूप अरुंद आहेत. काही दिवसांपूर्वी गोराई खाडीजवळ झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. जर महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) रो-रो प्रकल्प राबवत असेल, तर बीएमसीसारख्या नागरी संस्थांनी खारफुटीच्या झाडांना धक्का न लावता रस्ते रुंदीकरणाचा विचार केला पाहिजे,” असे गोडिन्हो यांनी सांगितले.हेही वाचावसई-विरारचा महापौर लवकरच ठरणारदेशातील पहिले रजोनिवृत्ती क्लिनिक महाराष्ट्रात
Home महत्वाची बातमी बोरिवली ते गोराई दरम्यान नवीन जेट्टी
बोरिवली ते गोराई दरम्यान नवीन जेट्टी
बोरिवली (borivali) आणि गोराई (gorai) दरम्यानचा जलप्रवास लवकरच अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.
सध्या या मार्गावर एक ते दीड तासांचा वेळ लागत असला, तरी नव्या रो-रो (Ro-Ro) जेट्टीमुळे हा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. तसेच आता जेट्टीच्या कामाला वेग मिळाला असून प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे.
बोरिवली ते गोराई या मार्गावर रोजगार, दैनंदिन प्रवास आणि पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात.
दिवसभर फेऱ्या सुरू असतात आणि भाडे केवळ 10 ते 15 रुपये असल्याने गोराई बीचवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा स्वस्त पर्याय ठरतो.
मात्र प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात वेळ खर्च होतो. ही अडचण दूर करण्यासाठी रो-रो फेरीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.
जेट्टी (jetty) सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि वाहनांसाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे.
तसेच पर्यटकांची संख्या वाढल्याने स्थानिक व्यवसाय आणि रोजगारालाही चालना मिळेल, अशी माहिती गोराई गावठाण पंचायतीचे सदस्य रॉसी डिसोझा यांनी दिली.
दरम्यान, काही स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंचायत सदस्य रॉयस्टन गोडिन्हो यांनी गोराईतील अरुंद आणि अपघातप्रवण रस्त्यांकडे लक्ष वेधले आहे.
“गोराईला याचा नेमका फायदा कसा होईल, ही आमची मुख्य चिंता आहे. येथील रस्ते आधीच खूप अरुंद आहेत.
काही दिवसांपूर्वी गोराई खाडीजवळ झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.
जर महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) रो-रो प्रकल्प राबवत असेल, तर बीएमसीसारख्या नागरी संस्थांनी खारफुटीच्या झाडांना धक्का न लावता रस्ते रुंदीकरणाचा विचार केला पाहिजे,” असे गोडिन्हो यांनी सांगितले.हेही वाचा
वसई-विरारचा महापौर लवकरच ठरणार
देशातील पहिले रजोनिवृत्ती क्लिनिक महाराष्ट्रात
