मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस (Havey Rain In Mumbai) सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं आहे. पावसाचा रस्ते वाहतुक आणि लोकल सेवेवर (Mumbai Local Train) देखील मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला, अंधेरी, सांताक्रुझमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलसेवेवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नोकरदारवर्गाने घराबाहेर पडण्याआधी या सर्व परिस्थितीचा आढावा घ्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय.  मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर झालेला दिसून येत आहे. ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. तसेच ठाण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतुक देखील सध्या ठप्प झाली आहे. पश्विम रेल्वेवर सध्या काहीही परिणामा झालेला नाही. लांब पल्ल्याच्या एक्प्रेस गाड्यादेखील रद्द करण्यात आलं आहे. पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन देखील रद्द करण्यात आली आहे. 

मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस (Havey Rain In Mumbai) सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं आहे.पावसाचा रस्ते वाहतुक आणि लोकल सेवेवर (Mumbai Local Train) देखील मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला, अंधेरी, सांताक्रुझमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलसेवेवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नोकरदारवर्गाने घराबाहेर पडण्याआधी या सर्व परिस्थितीचा आढावा घ्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय. मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर झालेला दिसून येत आहे. ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. तसेच ठाण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतुक देखील सध्या ठप्प झाली आहे. पश्विम रेल्वेवर सध्या काहीही परिणामा झालेला नाही. लांब पल्ल्याच्या एक्प्रेस गाड्यादेखील रद्द करण्यात आलं आहे. पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन देखील रद्द करण्यात आली आहे. 

Go to Source