मुंबईत २७ बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना अटक

मुंबई पोलिसांनी एका विशेष मोहिमेअंतर्गत भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. गुरुवारी संपूर्ण शहरात ही मोहीम राबवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अटक केलेले लोक बेकायदेशीरपणे भारतात आले होते आणि त्यांना …

मुंबईत २७ बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना अटक

मुंबई पोलिसांनी एका विशेष मोहिमेअंतर्गत भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. 

 

गुरुवारी संपूर्ण शहरात ही मोहीम राबवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अटक केलेले लोक बेकायदेशीरपणे भारतात आले होते आणि त्यांना कोणतेही वैध कागदपत्रे दाखवता आली नाहीत, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

 

या सर्वांविरुद्ध परदेशी नागरिक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यात शहर पोलिसांनी ३५३ बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे आणि ही मोहीम सुरूच राहील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source