मुंबई महापालिकेकडून 15% पाणीकपात जाहीर
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) पाईपलाईन बदलण्याचे मोठे काम सुलभ करण्यासाठी 14 वॉर्डांमध्ये 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 ते 4 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत 24 तासांसाठी 15% पाणीकपात (Water cut) जाहीर केली आहे.तानसा धरणातून शहरातील सर्वात मोठ्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला कच्चे पाणीपुरवठा करणारी 2,750 मिमी तानसा पाणी पाईपलाईन (pipeline) महापालिका (bmc) बदलणार आहे. बाधित वॉर्डांमध्ये ए (कुलाबा, चर्चगेट, फोर्ट आणि नेव्ही नगर), सी (मरीन लाईन्स, चिरा बाजार, ठाकुरद्वार आणि भुलेश्वर), डी (ग्रँट रोड, वाळकेश्वर, मलबार हिल, तरदेव आणि हाजी अली), जी साउथ (वरळी आणि प्रभादेवी), जी नॉर्थ (दादर (पश्चिम), माहीम आणि धारावी); एच पूर्व (वांद्रे पूर्व, खार पूर्व आणि सांताक्रूझ पूर्व), एच पश्चिम (वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम), के पश्चिम (अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्ले पश्चिम), पी साउथ (गोरेगाव), पी नॉर्थ (मालाड, मनोरी आणि मढ), आर साउथ (कांदिवली आणि चारकोप), आर सेंट्रल (बोरिवली); आणि एल (कुर्ला, साकी नाका, चांदिवली आणि असल्फा) आणि एस वॉर्ड (भांडुप, पवई, कांजूरमार्ग आणि विक्रोळी).बाधित भागातील रहिवाशांना पुरेसा पाणीसाठा करण्यात यावा आणि कपाती दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असा सल्ला देण्यात आला आहे.हेही वाचाकल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींबाबत नगरविकास विभागाची बैठकमहाराष्ट्र सरकारकडून भजन मंडळांना निधी मंजूर
Home महत्वाची बातमी मुंबई महापालिकेकडून 15% पाणीकपात जाहीर
मुंबई महापालिकेकडून 15% पाणीकपात जाहीर
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) पाईपलाईन बदलण्याचे मोठे काम सुलभ करण्यासाठी 14 वॉर्डांमध्ये 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 ते 4 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत 24 तासांसाठी 15% पाणीकपात (Water cut) जाहीर केली आहे.
तानसा धरणातून शहरातील सर्वात मोठ्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला कच्चे पाणीपुरवठा करणारी 2,750 मिमी तानसा पाणी पाईपलाईन (pipeline) महापालिका (bmc) बदलणार आहे.
बाधित वॉर्डांमध्ये ए (कुलाबा, चर्चगेट, फोर्ट आणि नेव्ही नगर), सी (मरीन लाईन्स, चिरा बाजार, ठाकुरद्वार आणि भुलेश्वर), डी (ग्रँट रोड, वाळकेश्वर, मलबार हिल, तरदेव आणि हाजी अली), जी साउथ (वरळी आणि प्रभादेवी), जी नॉर्थ (दादर (पश्चिम), माहीम आणि धारावी); एच पूर्व (वांद्रे पूर्व, खार पूर्व आणि सांताक्रूझ पूर्व), एच पश्चिम (वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम), के पश्चिम (अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्ले पश्चिम), पी साउथ (गोरेगाव), पी नॉर्थ (मालाड, मनोरी आणि मढ), आर साउथ (कांदिवली आणि चारकोप), आर सेंट्रल (बोरिवली); आणि एल (कुर्ला, साकी नाका, चांदिवली आणि असल्फा) आणि एस वॉर्ड (भांडुप, पवई, कांजूरमार्ग आणि विक्रोळी).
बाधित भागातील रहिवाशांना पुरेसा पाणीसाठा करण्यात यावा आणि कपाती दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असा सल्ला देण्यात आला आहे.हेही वाचा
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींबाबत नगरविकास विभागाची बैठक
महाराष्ट्र सरकारकडून भजन मंडळांना निधी मंजूर
