मुंबईतील डासांची समस्या आणखीन बिकट

मुंबईच्या (mumbai) उपनगरांमध्ये डासांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात क्युलेक्स डास (Mosquitoes) ही एक मोठी समस्या बनली आहे. गेल्या काही आठवड्यात ही समस्या आणखी बिकट झाली आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (bmc) या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी पालिका पाण्याचे गटार आणि नाले सफाई करत आहे. आरे मिल्क कॉलनी आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड सारखे क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित आहेत. अनेक उंच इमारतींमध्ये, डासांचे थवे आत येऊ नयेत म्हणून लोकांना संध्याकाळी खिडक्या बंद ठेवाव्या लागतात. रहिवाशांचे म्हणणे आहे की धुरीकरण आणि फॉगिंगमुळे डासांच्या संख्येवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. अनेक नागरिक यासाठी चालू बांधकाम आणि ढिगाऱ्याला जबाबदार धरत आहेत. तसेच साचलेले पाणी आणि कचरा यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. काहींना डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये (disease) वाढ होण्याची चिंता आहे. काहींना असे वाटते की मुंबईतील खराब हवेची गुणवत्ता, धूळ आणि कचरा यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. अहवालांनुसार, अनेकांची तक्रार आहे की डासांचा आवाजाने आणि ते चावल्याने झोपेत व्यत्यय येतो. यामुळे दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे. रहिवासी अतिरिक्त खबरदारी घेत आहेत, परंतु समस्या जैसे थे आहे.हेही वाचा जुहू येथे पाळीव प्राण्यांसाठी ‘पेट पार्क’ ची स्थापना मुंबईत 13 वर्षाच्या मुलीला जीबीएसची लागण

मुंबईतील डासांची समस्या आणखीन बिकट

मुंबईच्या (mumbai) उपनगरांमध्ये डासांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात क्युलेक्स डास (Mosquitoes) ही एक मोठी समस्या बनली आहे. गेल्या काही आठवड्यात ही समस्या आणखी बिकट झाली आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (bmc) या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी पालिका पाण्याचे गटार आणि नाले सफाई करत आहे. आरे मिल्क कॉलनी आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड सारखे क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित आहेत. अनेक उंच इमारतींमध्ये, डासांचे थवे आत येऊ नयेत म्हणून लोकांना संध्याकाळी खिडक्या बंद ठेवाव्या लागतात. रहिवाशांचे म्हणणे आहे की धुरीकरण आणि फॉगिंगमुळे डासांच्या संख्येवर याचा काहीही परिणाम झालेला नाही.अनेक नागरिक यासाठी चालू बांधकाम आणि ढिगाऱ्याला जबाबदार धरत आहेत. तसेच साचलेले पाणी आणि कचरा यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. काहींना डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये (disease) वाढ होण्याची चिंता आहे. काहींना असे वाटते की मुंबईतील खराब हवेची गुणवत्ता, धूळ आणि कचरा यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. अहवालांनुसार, अनेकांची तक्रार आहे की डासांचा आवाजाने आणि ते चावल्याने झोपेत व्यत्यय येतो. यामुळे दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे. रहिवासी अतिरिक्त खबरदारी घेत आहेत, परंतु समस्या जैसे थे आहे. हेही वाचाजुहू येथे पाळीव प्राण्यांसाठी ‘पेट पार्क’ ची स्थापनामुंबईत 13 वर्षाच्या मुलीला जीबीएसची लागण

Go to Source