भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्यात येणार

मुंब्रा येथील रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता अधिकाधिक वातानुकूलित लोकल प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल सेवा आणताना जादा तिकीट दराचा भार प्रवाशांवर पडू नये यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ‘एक तिकीट’ योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंब्रा येथील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘पीक अर्वस’मध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करणे शक्य झाले आहे. परंतु, खासगी आस्थापनात थोडीफार अडचण येत असली तरी त्यावर केंद्र व राज्य सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन 5 हजार बसेस उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 11 वर्षांतील विकासकामांची माहिती देणारे ‘सेवा आणि सुशासनाची अकरा वर्षे’ पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारत ते विकसित भारताकडे जाण्याची ही 11 वर्षे आहेत. परिवर्तनशील दशक पूर्ण करत एका दशकाची ही वाटचाल आहे’. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.हेही वाचा पालघर स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या गाड्यांना अतिरिक्त थांबामुंबई लोकल अपघाताच्या संख्येत मोठी वाढ

भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्यात येणार

मुंब्रा येथील रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता अधिकाधिक वातानुकूलित लोकल प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल सेवा आणताना जादा तिकीट दराचा भार प्रवाशांवर पडू नये यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ‘एक तिकीट’ योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंब्रा येथील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘पीक अर्वस’मध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करणे शक्य झाले आहे. परंतु, खासगी आस्थापनात थोडीफार अडचण येत असली तरी त्यावर केंद्र व राज्य सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन 5 हजार बसेस उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 11 वर्षांतील विकासकामांची माहिती देणारे ‘सेवा आणि सुशासनाची अकरा वर्षे’ पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारत ते विकसित भारताकडे जाण्याची ही 11 वर्षे आहेत. परिवर्तनशील दशक पूर्ण करत एका दशकाची ही वाटचाल आहे’. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.हेही वाचापालघर स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या गाड्यांना अतिरिक्त थांबा
मुंबई लोकल अपघाताच्या संख्येत मोठी वाढ

Go to Source