BMC निवडणुकीत महायुतीच जिंकणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली असली तरी मुंबईत महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. त्यामुळे निवडणुका झाल्या तरी बृहन्मुंबई महानगरपालिका आपला भगवा फडकवेल आणि विधानसभा निवडणुकीतही जागा वाढतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय हा आभासी असल्याची टिप्पणी फडणवीस यांनी केली.मुंबई पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्या प्रचारासाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आदी उपस्थित होते.भाजपचे ज्येष्ठ नेते मधू देवळेकर मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून येत होते. भाजपची ही जागा अनेक वर्षांपासून मित्रपक्षाला देण्यात आली होती. मात्र आता ती परत मिळाली असून खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी ही जागा जिंकणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.शुक्रवारी भाजपच्या संघटनात्मक पातळीवर चार महत्त्वाच्या बैठका झाल्या असून एका बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. अन्य बैठकीत विधानसभा निवडणुकीची तयारी आणि रणनीती ठरणार आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय सह सरचिटणीस मंत्री शिवप्रकाश निवडक प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेणार आहेत.या बैठकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, सुकाणू समिती सदस्य चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे पदाधिकारी, आमदार, खासदार आणि अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. आमदार आणि बूथ स्तरावरील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होणार आहे.हेही वाचामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक : राज ठाकरेंची भाजपकडे 20 जागांची मागणी?
अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल
Home महत्वाची बातमी BMC निवडणुकीत महायुतीच जिंकणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
BMC निवडणुकीत महायुतीच जिंकणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली असली तरी मुंबईत महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. त्यामुळे निवडणुका झाल्या तरी बृहन्मुंबई महानगरपालिका आपला भगवा फडकवेल आणि विधानसभा निवडणुकीतही जागा वाढतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय हा आभासी असल्याची टिप्पणी फडणवीस यांनी केली.
मुंबई पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्या प्रचारासाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आदी उपस्थित होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते मधू देवळेकर मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून येत होते. भाजपची ही जागा अनेक वर्षांपासून मित्रपक्षाला देण्यात आली होती. मात्र आता ती परत मिळाली असून खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी ही जागा जिंकणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.
शुक्रवारी भाजपच्या संघटनात्मक पातळीवर चार महत्त्वाच्या बैठका झाल्या असून एका बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. अन्य बैठकीत विधानसभा निवडणुकीची तयारी आणि रणनीती ठरणार आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय सह सरचिटणीस मंत्री शिवप्रकाश निवडक प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेणार आहेत.
या बैठकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, सुकाणू समिती सदस्य चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे पदाधिकारी, आमदार, खासदार आणि अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. आमदार आणि बूथ स्तरावरील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होणार आहे.हेही वाचा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : राज ठाकरेंची भाजपकडे 20 जागांची मागणी?अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल