बांगलादेशातील चितगावमध्ये भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी बंद
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशच्या चितगाव येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने (IVAC) सर्व व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याची घोषणा केली आहे. शहरातील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालय (AHCI) जवळ झालेल्या सुरक्षा घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
ALSO READ: बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला
IVAC बांगलादेशने म्हटले आहे की रविवारपासून पुढील आदेश येईपर्यंत व्हिसा सेवा निलंबित राहतील. या संदर्भात IVAC ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की स्थानिक परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतरच व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थिती लक्षात घेता कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.
ALSO READ: ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना धमक्या, भारताने कडक कारवाईची मागणी केली
बांगलादेशच्या अनेक भागात हिंसाचार सुरू असताना व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी, मैमनसिंग जिल्ह्यात 27 वर्षीय हिंदू तरुण दीपू चंद्र दासच्या हत्येप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली.
ALSO READ: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवले
कथित आरोपांवरून तरुणावर जमावाने हल्ला केला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये अटकेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, रॅपिड अॅक्शन बटालियन (RAB) ने सात संशयितांना अटक केली, तर पोलिसांनी तिघांना अटक केली.
Edited By – Priya Dixit
