Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले. पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील भाषणादरम्यान या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले. पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील भाषणादरम्यान या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. शोक व्यक्त करत पीएम मोदींनी पीडितांना सर्वतोपरी मदत देण्याची घोषणा केली आहे

यासोबतच पंतप्रधान मोदींनी हातरस दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हातरस दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो, असे अमित शाह म्हणाले. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासोबतच स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. 

 

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरात आयोजित भोले बाबांच्या सत्संगात मंगळवारी चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 100 हुन अधिक जणांना जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. मृतांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. या चेंगराचेंगरीत 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाथरसमधील सिकंदरराव येथे चेंगराचेंगरी झाली तेव्हा घटनास्थळी सुमारे 40 हजार लोक उपस्थित होते. घटनास्थळी चेंगराचेंगरी आणि आरडाओरडा झाला.

 

Edited by – Priya Dixit   

 

 

Go to Source