सह्याद्री पर्वतरांगेत स्थित नाशिकचा हरिहर किल्ला इतिहासप्रेमी आणि सहसींना आकर्षित करतो

Maharashtra Tourism : हरिहर किल्ला नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहे. हा किल्ला इतिहासप्रेमी आणि साहसी दोघांनाही आकर्षित करतो. त्याच्या त्रिकोणी रचनेमुळे आणि उंच कड्यावर असलेल्या स्थानामुळे, तो अजिंक्य मानला जातो.

सह्याद्री पर्वतरांगेत स्थित नाशिकचा हरिहर किल्ला इतिहासप्रेमी आणि सहसींना आकर्षित करतो

Maharashtra Tourism : हरिहर किल्ला नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहे. हा किल्ला इतिहासप्रेमी आणि साहसी दोघांनाही आकर्षित करतो. त्याच्या त्रिकोणी रचनेमुळे आणि उंच कड्यावर असलेल्या स्थानामुळे, तो अजिंक्य मानला जातो. हरिहर किल्ला, ज्याला हर्षगड असेही म्हणतात, हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गिरिदुर्ग आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी एक रोमांचक स्थळ आहे. हरिहर किल्ल्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे खडकात कोरलेले ११७ पायऱ्यांचे जिना, ज्यामुळे किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. उंचवट्याच्या प्रदेशात वसलेला हा ट्रेक थोडा आव्हानात्मक आहे, पण अनुभव खरोखरच रोमांचक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा किल्ला महत्त्वाचा मानला जात आहे. गोंडा घाटातून जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. तसेच हा किल्ला त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे आणि तो प्राचीन काळापासून रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे.

ALSO READ: सज्जनगड किल्ला सातारा

इतिहास

हा किल्ला ६व्या शताब्दीमध्ये यादव वंशाच्या काळात बांधला गेला असावा. नंतर तो बहमनी सल्तनत, निजामशाही, मराठ्यांच्या ताब्यात आला. १६३६ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी निजामशाही पुनर्स्थापनेसाठी त्र्यंबकगडासोबत हा किल्लाही जिंकला. ब्रिटिश काळात इंग्रजांनी गडाच्या वाटा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण हा किल्ला अजेय राहिला. तसेच पश्चिम घाटातील व्यापारमार्गांची देखरेख करण्यासाठी हा किल्ला वापरला गेला. आजही पायथ्याच्या गावांना टाके हर्ष, आखली हर्ष अशी नावे आहे, जी त्याच्या ऐतिहासिक मालकीची साक्ष देतात.

 

नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस २० किमी अंतरावर, त्र्यंबकेश्वरपासून १५-४० किमी अंतरावर. हा किल्ला ३,६७६ फूट उंच आहे.  त्रिकोणी रचना असलेला हा किल्ला एका उंच पहाडावर बांधलेला आहे, ज्यामुळे तो नैसर्गिक किल्ला म्हणून ओळखला जातो.

 

किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व  

त्र्यंबक पर्वतरांगेत असलेल्या या किल्ल्याला काही ठिकाणी ‘हरिहरगड’ किंवा ‘हर्षगड’ असेही म्हणतात. या नावांमुळे, स्थानिकांनी आणि ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख केला आहे.

 

ट्रेकिंगचा अनुभव

हरिहर किल्ला हा ट्रेकर्ससाठी एक अद्भुत पण काहीसा आव्हानात्मक ठिकाण आहे. त्याच्या ११७ पायऱ्यांच्या जिना, उंच पर्वतरांगा आणि सुंदर दृश्ये ट्रेकर्समध्ये आवडतात. हिवाळा हा ट्रेक करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

ALSO READ: छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला

हरिहर किल्ला नाशिक जावे कसे?

हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मुख्य मार्ग आहे. तसेच नाशिक शहरापासून अंतर अंदाजे ४०-४५ किलोमीटर आहे. वाहतूक: बस, कार किंवा मोटारसायकलने सहज पोहोचता येते.

ALSO READ: ट्रेकिंगसाठी ओळखला जाणारा तुंग किल्ला