देवरुखात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या सकाळी ६ वाजल्यापासून रांगा! खतांच्या अपुऱ्या पुरवठ्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

देवरुख प्रतिनिधी देवरुखात खत खरेदीसाठी शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. पावसाचा सामना करत हे शेतकरी रांगेत उभे असल्याचे चित्र होते. १०० मीटर अंतरापर्यंत शेतकऱ्यांची रांग लागली होती. तालुक्यातील पूर, पाटगाव, ओझरे, सायले, सोनवडे, बोरसुत, विग्रवली आदी गावातील २००हुन अधिक शेतकरी रांगेत तिष्ठत उभे होते. अखेर ११ वाजता खत साठा संपल्याने […]

देवरुखात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या सकाळी ६ वाजल्यापासून रांगा! खतांच्या अपुऱ्या पुरवठ्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

देवरुख प्रतिनिधी

देवरुखात खत खरेदीसाठी शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
पावसाचा सामना करत हे शेतकरी रांगेत उभे असल्याचे चित्र होते. १०० मीटर अंतरापर्यंत शेतकऱ्यांची रांग लागली होती. तालुक्यातील पूर, पाटगाव, ओझरे, सायले, सोनवडे, बोरसुत, विग्रवली आदी गावातील २००हुन अधिक शेतकरी रांगेत तिष्ठत उभे होते. अखेर ११ वाजता खत साठा संपल्याने अनेक शेतकऱ्यान खताविना खाली हात परतावे लागले. खत विक्रेत्यांनी चार दिवसानंतर खत येईल असे शेकऱ्याना सांगितले.
कृषी विभागाच्या अनागोंदी कारभराबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खत उपलब्ध होईपर्यंत शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबवायची का असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे.