मुंबईत दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणीकपात

पावसाने निरोप घेताच मुंबईकरांना दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाल्याने 17 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत संपूर्ण मुंबईत 5 ते 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं दोन दिवस मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.  वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमध्ये ताराळी (जिल्हा ठाणे) येथे 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे जलवाहिनी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 5 ते 10 टक्के इतकी घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी गुरूवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ते शुक्रवार 18 ऑक्टोबर 2024 या दोन दिवसांच्या कालावधीत 5 ते 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.  मुंबई शहर व उपनगरास मुख्‍यत्‍वे वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. या धरणामधून पाणी वाहून नेणा-या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमधील ताराळी (जिल्हा ठाणे) येथे 900 मिलीमीटर झडपेमध्‍ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्‍ती करण्‍याचे काम तातडीने हाती घेण्‍यात आले आहे. त्‍यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात (मुंबई शहर व उपनगर) पाणी पुरवठा करणा-या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठयामध्‍ये 5 ते 10 टक्‍के घट होणार आहे. 

मुंबईत दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणीकपात

पावसाने निरोप घेताच मुंबईकरांना दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाल्याने 17 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत संपूर्ण मुंबईत 5 ते 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं दोन दिवस मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमध्ये ताराळी (जिल्हा ठाणे) येथे 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे जलवाहिनी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 5 ते 10 टक्के इतकी घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी गुरूवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ते शुक्रवार 18 ऑक्टोबर 2024 या दोन दिवसांच्या कालावधीत 5 ते 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबई शहर व उपनगरास मुख्‍यत्‍वे वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. या धरणामधून पाणी वाहून नेणा-या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमधील ताराळी (जिल्हा ठाणे) येथे 900 मिलीमीटर झडपेमध्‍ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्‍ती करण्‍याचे काम तातडीने हाती घेण्‍यात आले आहे. त्‍यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात (मुंबई शहर व उपनगर) पाणी पुरवठा करणा-या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठयामध्‍ये 5 ते 10 टक्‍के घट होणार आहे. 

Go to Source