‘अबकी बार 400 पार….. ‘ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं घोषवाक्य ठरलं

सध्या देशात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष, आघाड्या, युती आणि अपक्षही कामाला लागले आहेत. दरम्यान आज पक्षाच्या मुख्यालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली. ज्यामध्ये भाजपच्या प्रचाराचं घोषवाक्य ठरलं आहे. ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य या निवडणुकीत असणार आहेत. भाजपाने यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही घोषवाक्यांवर मोठा भर दिला होता. […]

‘अबकी बार 400 पार….. ‘ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं घोषवाक्य ठरलं

सध्या देशात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष, आघाड्या, युती आणि अपक्षही कामाला लागले आहेत. दरम्यान आज पक्षाच्या मुख्यालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली. ज्यामध्ये भाजपच्या प्रचाराचं घोषवाक्य ठरलं आहे.
‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य या निवडणुकीत असणार आहेत. भाजपाने यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही घोषवाक्यांवर मोठा भर दिला होता. सन २०१४ च्या निवडणुकीत बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार हे घोषवाक्य दिलं होतं. तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत फिर एक बार मोदी सरकार हे घोषवाक्य घेऊन प्रचार केला होता. आता, मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांच्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने आपलं घोषवाक्य निश्चित केलं आहे. ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, हे घोषवाक्य निश्चित केलं आहे.