T20 World Cup 2026 मधील विजयाबद्दल बीसीसीआयकडून भारतीय संघाला १३१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर
टी-२० विश्वचषक २०२६ मधील विजयाबद्दल बीसीसीआयने भारतीय संघाला १३१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे अशी माहिती समोर आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयाचे औचित्य साधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे.
ALSO READ: संजू सॅमसनला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले
बीसीसीआयने भारतीय संघासाठी १३१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्कम २०२४ मधील बक्षीस रकमेपेक्षा (१२५ कोटी) ६ कोटींनी जास्त आहे. भारत आता टी-२० विश्वचषकाचे तीन वेळा (२००७, २०२४ आणि २०२६) जेतेपद मिळवणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. अंतिम सामन्यात संजू सॅमसनने ८९ धावांची वादळी खेळी केली, संजू सॅमसनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आले. हा विजय अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा झाला, ज्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे.
ALSO READ: विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंसाठी पुढील लक्ष्य आता आयपीएल २०२६ असेल
Edited By- Dhanashri Naik
