
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तत्काळ यावर प्रतिक्रिया देत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ( INDIA bloc without Mamata Banerjee )
इंडिया आघाडी प. बंगालमधील निवडणुका आघाडी प्रमाणेच लढेल
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, इंडिया आघाडी पश्चिम बंगालमधील निवडणुका ही आघाडी प्रमाणेच लढेल. तसेच तृणमूल काँग्रेसबरोबरील आमची जागा वाटपाची चर्चा फलदायी ठरेल आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशिवाय इंडिया आघाडीची आमीही कल्पनाही करु शकत नाही, ( INDIA bloc without Mamata Banerjee )
इंडिया आघाडी पश्चिम बंगालमध्ये युतीप्रमाणेच लढेल. काँग्रेस अध्यक्ष (मल्लिकार्जुन खर्गे) यांनी अनेक वेळा घोषणा केली की भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्यासाठी सर्व भारतीय गट पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे, याचा पुन्नरुच्चारही जयराम रमेश यांनी केला.
‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ कल पश्चिम बंगाल पहुंचेगी।
26-27 जनवरी को यात्रा नहीं होगी और 28 जनवरी को पश्चिम बंगाल में यात्रा शुरू होगी।
मैं असम के मुख्यमंत्री का धन्यवाद देना चाहता हूं, जिन्होंने हमारी यात्रा को अपनी धमकियों से पब्लिसिटी दी।
हम डरने वाले नहीं हैं..पीछे नहीं… pic.twitter.com/SlDLHcQHn5
— Congress (@INCIndia) January 24, 2024
Latest Marathi News ममतांचा ‘स्वबळा’चा ‘नारा’, काँग्रेस म्हणाले,” इंडिया आघाडीची कल्पना..” Brought to You By : Bharat Live News Media.
