दावोस परिषदेत ३ लाख ५३ हजार कोटी सामंजस्य करारावर स्वाक्षरी: मुख्यमंत्री

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून यावर्षी 3 लाख 53 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्या. त्याचप्रमाणे, जवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करारावर स्वाक्षरी होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी सारस्य दाखविले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज … The post दावोस परिषदेत ३ लाख ५३ हजार कोटी सामंजस्य करारावर स्वाक्षरी: मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

दावोस परिषदेत ३ लाख ५३ हजार कोटी सामंजस्य करारावर स्वाक्षरी: मुख्यमंत्री

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून यावर्षी 3 लाख 53 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्या. त्याचप्रमाणे, जवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करारावर स्वाक्षरी होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी सारस्य दाखविले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१९)  मुंबईत सांगितले. CM Eknath Shinde
जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य व केंद्र शासनाचे शिष्टमंडळ दावोस येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. CM Eknath Shinde
मुख्यमंत्री म्हणाले की, अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरीया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यूएसई, ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर अर्शीया, मित्तल, जिंदाल, गोदरेज, अदानी या कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला असल्याचे मत मुख्यमंत्री  शिंदे यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, मागील वर्षी दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी 75 ते 80 टक्के करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले. या करारामुळे 2 लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहे. जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्प, खार उद्योग अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे. जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात 1 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या समविचारी संबंधामुळे उद्योजक हे आत्मविश्वासाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचा अनुभव मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या उत्तम सुविधा, कुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इको सिस्टिम आहे. त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व्हिजन, डॉयनॅमिक लिडरशीप, ग्लोबल लिडर म्हणून त्यांची ओळख झाली असल्याचे दावोस दौऱ्यात अनेक देशातील लोकांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव जगभरात असून त्यांचे नाव लोक आदराने घेतात. परदेशी गुंतवणुकीसाठी याचाही फायदा महाराष्ट्राला झाला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

स्वित्झर्लंड मधील दावोस शहरात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेची यशस्वी सांगता करून आज मुंबईत परतलो. मुंबई विमानतळावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मिळून माझे अभूतपूर्व असे स्वागत केले.
या दौऱ्यात ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून १ लाख कोटींच्या… pic.twitter.com/ivKQJgKvtc
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 18, 2024

हेही वाचा 

Davos 2024: एमएमआरडीए – फिनलँड येथील रिव्हर रिसायकल ओवाय यांच्यात सामंजस्य करार
दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार : मुख्यमंत्री शिंदे
Eknath Shinde : दावोस येथे विविध देशांच्या शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; औद्योगिक गुंतवणुकींबाबत चर्चा

Latest Marathi News दावोस परिषदेत ३ लाख ५३ हजार कोटी सामंजस्य करारावर स्वाक्षरी: मुख्यमंत्री Brought to You By : Bharat Live News Media.