Weather Update : राज्यात पाऊस थांबला, तापमानात वाढ

पुणे : देशभरासह राज्यातील सर्वच भागातून पाऊस थांबला असून पश्चिमी चक्रवात मात्र तीव्र झाल्याने उत्तर भारत गारठला आहे. त्यामुळे आगामी दोन ते तीन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात किंचित घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे देशात सर्वत्र पाऊस सुरु होता. तो आता थांबला आहे. उत्तर भारतात मात्र पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्यामुळे कश्मिर, पंजाबपासून मध्यप्रदेशपर्यंत थंडी वाढली आहे.
राज्याचे गुरुवारचे किमान तापमान…
छत्रपती संभाजीनगर 14.6, पुणे 17.3, मुंबई 23.2, अहमदनगर 15.4, जळगाव 16.1, कोल्हापूर 19.1, महाबळेश्वर 15, सांगली 18.7, सातारा 17.4, सोलापूर 19.4, बीड 15.5, अकोला 17, यवतमाळ 15.5.
हेही वाचा
मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; तिन्ही पक्षांत मंत्रिपदासाठी रस्सीखेच
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्यावर
पंतप्रधान मोदींकडून नाशिककरांना मोठ्या अपेक्षा
Latest Marathi News Weather Update : राज्यात पाऊस थांबला, तापमानात वाढ Brought to You By : Bharat Live News Media.
