राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ’सैराट झालं जी’

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : प्रेमवीरांचा सध्या पळून जाऊन लग्न करण्याचा सपाटा सुरू आहे. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलांसह जवळपास 41 तरुणी पळून गेल्याचे नोंदले गेले आहे. नोंद नसलेल्यांची संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. यापैकी 85 टक्के अविवाहित तरुणाईने प्रेमविवाह करून आपला संसार थाटला आहे. पालक आणि मुलांमध्ये मैत्रिपूर्ण नातेसंबंध असणे आवश्यक असल्याचे … The post राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ’सैराट झालं जी’ appeared first on पुढारी.

राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ’सैराट झालं जी’

नसरापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रेमवीरांचा सध्या पळून जाऊन लग्न करण्याचा सपाटा सुरू आहे. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलांसह जवळपास 41 तरुणी पळून गेल्याचे नोंदले गेले आहे. नोंद नसलेल्यांची संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. यापैकी 85 टक्के अविवाहित तरुणाईने प्रेमविवाह करून आपला संसार थाटला आहे. पालक आणि मुलांमध्ये मैत्रिपूर्ण नातेसंबंध असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
नसरापूर (ता. भोर) येथील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अनेक कारणे सांगून बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. 31 डिसेंबर 2023 वर्षअखेर विवाहित पुरुष 15 तसेच 12 ज्येष्ठ घरातून निघून गेल्याच्या पोलिस ठाण्यात नोंदी आहेत, तर 6 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. 18 वर्षांपुढील 22 तरुणी, विवाहित असलेल्या 19 महिला घरगुती कारणावरून निघून गेल्या होत्या. वय 18 वर्षांपुढील 17 तरुणदेखील घरातून निघून गेल्याच्या नोंदी आहेत. सोशल मीडियाच्या छंदातून प्रेमविवाह करण्याचे चित्र अधिक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पालकवर्ग चिंतेत आहे.
राजगड पोलिसांनी बेपत्ता झालेल्या जवळपास सर्व व्यक्तींना शोधण्यात यश मिळविले असून, जवळपास 95 टक्के बेपत्ता व्यक्ती मिळून आल्या आहेत. पळून गेलेल्या अनेक तरुणींनी व तरुणांनी ’तूच माझी आर्ची अन् मी तुझ्या परश्या’ म्हणत स्वतःचा जोडीदार निवडल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, काही मुली-मुलांनी लग्न केल्यानंतर एकमेकांची फसवणूक झाल्याच्या लक्षात आल्यावर त्यांच्यात कलह निर्माण होत आहे. तर काहीजण खोटे पती-पत्नी म्हणून राहत असल्याचे बोलले जात आहे. घरातून रुसून गेलेल्या काही तरुणी व विवाहित महिला या आपल्या मैत्रिणींकडे अथवा कामाला असलेल्या ठिकाणी मिळून आल्याचे
चित्र आहे.
‘बहाणे तो एक से एक’
कॉलेज, क्लासला जाऊन येते, मैत्रिणीकडे जाऊन येते, अशी बहाणे सांगून पळून जाणार्‍या मुलींची संख्या वाढत आहे. यामुळे उभे आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुली पळून जात असल्याने पालकवर्ग दु:खी आहे.
पालकांच्या खबरीनुसार मिसिंग दाखल करून तपास केला जातो. मात्र, मुले आणि पालकांमध्ये सुसंवाद वेळीच होणे आवश्यक आहे. मुलींबाबतच्या समस्या दूर करण्यासाठी पालकांनी पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाला संपर्क करावा. जेणेकरून यातून लवकर मार्ग निघू शकतो.
                                             नितीन खामगळ, सहायक पोलिस निरीक्षक.
 
Latest Marathi News राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ’सैराट झालं जी’ Brought to You By : Bharat Live News Media.