राज्यात २२ जानेवारीला दीड लक्ष मंदिरात होणार दिवाळी साजरी : बावनकुळे
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : सुमारे ५२७ वर्षांनंतर अयोध्येत प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर साकारले जात आहे. जगातील सर्वांत मोठी दिवाळी २२ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात दीड लक्ष मंदिरात अयोध्येतील श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना करण्याचा सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचा विचार स्वीकारून व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करून केवळ मतांच्या लांगूलचालनाकरिता उद्धव ठाकरे राम मंदिर विरोधातील भूमिका घेत आहेत. असे करून ते हिंदू समाजाचा अपमान करीत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की, असा कुणीतरी प्रधानमंत्री व्हावा, ज्याने प्रभू रामचंद्राची स्थापना जगातील सर्वांत सुंदर मंदिरात करावी. आता, तो दिवस आला आहे. मात्र, त्या दिवसावर उद्धव ठाकरे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील हिंदू समाज देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृती टिकविणारा आहे, त्याला डिवचण्याचे काम ठाकरे करीत आहेत. श्रीराम मंदिराचे श्रेय कधीच पंतप्रधान मोदी किंवा भाजपने घेतलेले नाही.
या देशातील जनतेची भावनिक मागणी पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात व आता रामंदिराच्या विरोधात घेतलेली त्यांची भूमिका केवळ मतांच्या लांगूलचालनाकरीता आहे. जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा
नागपूर : कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी बावनकुळे यांची फेरनिवड
उमरखेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध
Maharashtra Politics | उद्धव देवालये बंदिस्त ठेवून मद्यालये उघडत होते, बावनकुळेंची खोचक पोस्ट
Latest Marathi News राज्यात २२ जानेवारीला दीड लक्ष मंदिरात होणार दिवाळी साजरी : बावनकुळे Brought to You By : Bharat Live News Media.