पश्चिम किनारपट्टीत गोव्यावर अल्प परिणाम

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्याची किनारपट्टी सर्वांत मजबूत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मागील तीन दशकांत किनारपट्टीची केवळ 19.2 टक्के धूप झाली आहे, तर किनारपट्टी 13.7 टक्क्यांनी वाढली आहे. याचाच अर्थ पश्चिम किनारपट्टीत गोव्यावर बदलाचा फारसा परिणाम झालेला नाही. 1990 आणि 2018 दरम्यान भारताच्या किनार्‍यावरील बदलांबाबत अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासातील तपशिलानुसार, गोव्याच्या किनारपट्टीवर सर्वाधिक … The post पश्चिम किनारपट्टीत गोव्यावर अल्प परिणाम appeared first on पुढारी.

पश्चिम किनारपट्टीत गोव्यावर अल्प परिणाम

पणजी; Bharat Live News Media वृत्तसेवा : गोव्याची किनारपट्टी सर्वांत मजबूत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मागील तीन दशकांत किनारपट्टीची केवळ 19.2 टक्के धूप झाली आहे, तर किनारपट्टी 13.7 टक्क्यांनी वाढली आहे. याचाच अर्थ पश्चिम किनारपट्टीत गोव्यावर बदलाचा फारसा परिणाम झालेला नाही.
1990 आणि 2018 दरम्यान भारताच्या किनार्‍यावरील बदलांबाबत अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासातील तपशिलानुसार, गोव्याच्या किनारपट्टीवर सर्वाधिक 67.1टक्के स्थिरता आहे. साधारणपणे किनारपट्टी 93.72 कि.मी. व्यापते. याव्यतिरिक्त, राज्याच्या किनारपट्टीची धूप होण्याची टक्केवारी 19.2 टक्के आहे. जे तुलनेत 26.82 कि.मी. इतके आहे. गोव्याची किनारपट्टी देखील 13.7 टक्क्यांनी वाढली आहे, याचा अर्थ गोव्याची किनारपट्टी 19.1 कि.मी.ने वाढली आहे.
नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च (एनसीसीआर) ने जो डेटा तयार केला त्यात भारताच्या विकसित होत असलेल्या किनारपट्टीचे सर्वसमावेशक चित्र सादर केले आहे. ते केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी राज्यसभेसमोर ठेवले होते. या निष्कर्षांच्या अनुषंगाने किनारपट्टीवरील धूप आणि समुद्राची वाढती पातळी यामुळे ज्यांची जमीन गमावण्याचा धोका आहे, त्या समुदायांचे पुनर्वसन करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. 15 व्या वित्त आयोगाने या आव्हानांना तोंड देण्यासाठी उपायांची शिफारस केली आहे, ज्यांच्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या उपजीविकेचे आणि निवासस्थानांचे रक्षण करण्याच्या महत्त्वावरही जोर देण्यात आला आहे, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
सुमारे तीन दशकांच्या कालावधीत, या अभ्यासात धूप, स्थिरता आणि वाढ़ या मुद्द्यांचा विचार केला गेला. याचा उपयोग एनसीसीआरला तटीय धूप रोखण्यासाठी करता येणार आहे. केरळमध्ये 46.4 टक्के किनारपट्टीची धूप (275.33 किमी), 30.8 टक्के (182.64 किमी) स्थिरता आणि 22.8टक्के (134.99 किमी) वाढ झाली. सर्व 11 किनारी राज्यांच्या एकत्रित आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की एकूण 6907.18 किमी किनारपट्टीपैकी 33.6 टक्के किनारपट्टीची धूप झाली आहे. तर 39.6 टक्के स्थिर राहिली आणि 26.9 टक्के वाढ झाली आहे.
सर्वात जास्त धूप दमण, दीव किनारपट्टीची
पश्चिम किनारपट्टीवरील गुजरात, दमण आणि दीव, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या किनारपट्टीने विविध किनारपट्टी बदल पाहिले आहेत. दमन आणि दीवने सर्वात जास्त धूप पाहिली, त्यांच्या 31.83 कि.मी. किनारपट्टीपैकी 34.6 टक्के किनारपट्टी गमावली. जी 11.02 कि.मी. आहे, त्यानंतर गुजरातने 27.6 टक्के किनारपट्टी (537.5 कि.मी.) गमावली आणि महाराष्ट्राने (739.57 कि.मी.पैकी 25.5 टक्के) गमावली. पूर्व किनारपट्टीवर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्रप्रदेश आणि ओडिशा, पश्चिम बंगाल त्यांच्या 534.35 कि.मी. किनारपट्टीपैकी 60.5 टक्के धूप अनुभवत होते. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशलाही लक्षणीय धूप सहन करावी लागत आहे, जी अनुक्रमे 42.7 टक्के आणि 28.7 टक्के आहे.

The post पश्चिम किनारपट्टीत गोव्यावर अल्प परिणाम appeared first on Bharat Live News Media.

Go to Source