दिल्ली एनसीआरमध्ये उष्णतेचा कहर; राजधानीत 33 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये भीषण उष्मा कायम आहे. नोएडानंतर दिल्लीत उष्माघातामुळे 33 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नोएडामध्ये उष्णतेमुळे नऊ जणांना जीव गमवावा लागला होता. बुधवारी (दि.19) दिल्लीत 12वर्षांतील सर्वात उष्ण दिवस होता. नोएडामध्ये उष्णतेमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला नोएडामध्ये विविध ठिकाणी नऊ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यातील …

दिल्ली एनसीआरमध्ये उष्णतेचा कहर; राजधानीत 33 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये भीषण उष्मा कायम आहे. नोएडानंतर दिल्लीत उष्माघातामुळे 33 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नोएडामध्ये उष्णतेमुळे नऊ जणांना जीव गमवावा लागला होता. बुधवारी (दि.19) दिल्लीत 12वर्षांतील सर्वात उष्ण दिवस होता.
नोएडामध्ये उष्णतेमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला
नोएडामध्ये विविध ठिकाणी नऊ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यातील पाच मृतदेहांची ओळख अद्यापही पटू शकलेली नाही. प्रचंड उकाडा आणि उकाड्यामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. संबंधित पोलीस ठाण्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.18) सेक्टर-125 येथील खासगी विद्यापीठाच्या गेट क्रमांक पाचजवळ कचरा गोळा करणाऱ्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटलेली नाही. सेक्टर 1 येथील टांकसाळीजवळ सायंकाळी 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अति उष्णतेमुळे वृद्धाचा मृत्यू होण्याची भीती आसपासच्या लोकांना वाटत होती.
दिल्लीतील मागील 12 वर्षातील सर्वात उष्ण रात्र
हवामान खात्याने सांगितले की, दिल्ली शहरात यापूर्वीची सर्वात उष्ण रात्र जून 2012 मध्ये नोंदवली गेली होती. जेव्हा किमान तापमान 34 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. या मोसमातील सर्वात उष्ण रात्र मंगळवारी (दि.18) दिल्लीत 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दिल्लीत उष्णतेमुळे 33 जणांचा मृत्यू झाला आहे
मंगळवारी उष्णतेमुळे 33 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांकडे अद्याप पाच जिल्ह्यांची आकडेवारी नाही. पोलिस उपायुक्तांचे म्हणणे आहे की, हे लोक फूटपाथवर आणि रात्रीच्या निवाऱ्यात राहत होते. प्राथमिक तपासात उष्माघात त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचे पोलिसांचे मत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, बेहोशी, उलट्या आणि चक्कर येण्याचे 100 हून अधिक रुग्ण दररोज दिल्लीच्या 38 हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहेत.
हेही वाचा :

चंद्रपूरात वेगवेगळ्या घटनांमध्ये लाच घेताना चौघांना अटक
सिल्ली येथे कालव्यामध्ये ट्रॅक्टर कोसळ्याने चालकाचा जागीच मृत्यू
Bigg Boss OTT 3 : कोण आहे ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षित? नोकरी सोडून केला व्यवसाय

Go to Source