खूषखबर! आला रे आला…मान्सून महाराष्ट्रात आला…

पुणे : पुढारी वृत्तसेवा – चार दिवासांपासून गोव्यात अडकलेला मान्सून गुरुवारी ६ जून रोजी दुपारी ३ वाजता तळकोकण ओलांडून पुढे आला. दुपारी ४ पर्यंत रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर शहरे काबिज केली होती. आगामी काही तासांत तो पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज आहे. यंदा तो राज्यात नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशीरा दाखल झाला …

खूषखबर! आला रे आला…मान्सून महाराष्ट्रात आला…

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा – चार दिवासांपासून गोव्यात अडकलेला मान्सून गुरुवारी ६ जून रोजी दुपारी ३ वाजता तळकोकण ओलांडून पुढे आला. दुपारी ४ पर्यंत रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर शहरे काबिज केली होती. आगामी काही तासांत तो पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज आहे. यंदा तो राज्यात नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशीरा दाखल झाला आहे.
हवेचे दाब अनुकूल होताच मान्सून गुरुवारी ६ जून रोजी राज्यात दाखल झाला. रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली शहरात आला. तशी अधिकृत घोषणा हवामान विभागाने गुरुवारी दुपारी ४ वाजता केली. आगामी १२ ते १६ तासांत तो पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याला यलो अलर्ट हवामान विभागाने दिला असून ७ ते ९ जूनपर्यंत राज्यात मुसळधारेचा अंदाज दिला आहे.
अधिक वाचा –

Mumbai Monsoon | मान्सून मुंबईत दाखल होण्यास पोषक वातावरण

हवेचे दाब अनुकूल होताच तो आला…
हवामान विभागाने यंदा मान्सून राज्यात ५ जून रोजी येईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र हवेचे दाब अनुकूल नसल्याने तो यंदा नियोजित तारखेपेक्षा एक दिवस उशीरा ६ जून रोजी आला. मागच्या वर्षीच्या तुलनेत दहा दिवस आधी पाऊस आला आहे. गेल्या चार दिवसांत तो गोवा भागातून इंचभर पुढेही सरकला नव्हता. कारण हवेचे दाब राज्यात १००६ हेक्टोपास्कल होते. ते गुरुवारी दुपारी १००४ हेक्टोपास्कल इतके झाले. त्यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होताच पावसाने राज्यात प्रवेश केला. आता तो वेगाने पुणे,मुं बई शहरात काही तासांच्या आत दाखल होण्याची शक्यता असून संपूर्ण राज्यात १० ते १४ दरम्यान दाखल होईल असा अंदाज आहे.
ईशान्य शाखा मात्र अडखळली
ईशान्य भारतात केरळच्या दोन दिवस आधीच मान्सून पोहोचला होता. त्याची गती रेमल चक्रीवादळामुळे वाढली. पण पुढे वादळ शांत होताच मान्सूनला पुढे जाण्यासाठी स्थिती अनुकूल राहिली नाही. त्यामुळे तो गेल्या आठ दिवसांपासून अडखळलेला आहे.
अधिक वाचा –

इंदापुरात नेत्यांच्या हाती घड्याळ; मात्र जनतेने फुंकली तुतारी

राज्याला ९ जूनपर्यंत यलो अलर्ट
मान्सून गोव्यापर्यंत आल्याने राज्यात बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे ९ जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या तीन दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
असे आहेत अलर्ट-
अतिवृष्टीः
कोकणः 9 ते 12 जून
मध्य महाराष्ट्रः 10 जून
मुसळधारः
कोकणः 7 व 8 जून
 मध्य महाराष्ट्रः 7 ते 11 जून

मराठवाडा : 7 ते 9 जून

विदर्भः 7 ते 9 जून
अधिक वाचा –

मावळात ‘महायुती’च्या बारणेंची हॅट्ट्रिक!