भाजपला प. बंगालमध्ये मोठे यश मिळेल, पीएम मोदींचा दावा
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक निकालाच्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा दावा केला आहे. “तृणमूल काँग्रेस पक्ष (TMC party) पश्चिम बंगालमधील निवडणुकीत अस्तित्वासाठी लढत आहे. यावेळी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य पश्चिम बंगाल असेल. भाजपला पश्चिम बंगालमध्ये मोठे यश मिळताना दिसत आहे.” असे पीएम मोदी यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ३ होतो आणि पश्चिम बंगालच्या लोकांनी आम्हाला ८० वर नेले. गेल्या निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले. यावेळी संपूर्ण देशात पश्चिम बंगाल हे सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य असेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळत आहे. तेथे निवडणूक एकतर्फी आहे, असे पीएम मोदी म्हणाले.
दरम्यान, मुस्लिमांसाठी ओबीसी कोट्याबाबतचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया यावर बोलताना पीएम मोदी यांनी ममतांवर व्होट बँक राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. जेव्हा कोलकाता उच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर एवढी मोठी फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले. पण त्याहून दुर्दैवी गोष्ट म्हणजे व्होट बँकेच्या राजकारणासाठी आता ते न्यायव्यवस्थेचाही दुरुपयोग करत आहेत. ही अशी परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह असू शकत नाही, असे पीएम मोदी यांनी म्हटले.
‘ओडिशात १० जून रोजी भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल’
मुलाखतीत पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले, “ओडिशाचे भाग्य बदलणार आहे. तिथले सरकार बदलेल. सध्याच्या ओडिशा सरकारची मुदत ४ जून संपत आहे आणि ओडिशात १० जून रोजी भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल.” असा दावाही मोदींनी केला आहे.
‘मौत का सौदागर’ असे कोण म्हणाले होते?
जिथपर्यंत मोदींचा प्रश्न आहे, गेल्या २४ वर्षांपासून मी शिव्या (गालियां) खाऊन ‘गाली प्रूफ’ झालो आहे. ‘मौत का सौदागर आणि ‘गंदी नाली का कीडा’, असे कोण म्हणाले होते? संसदेत आमच्या एका सहकाऱ्याने १०१ शिव्या मोजल्या होत्या. त्यामुळे निवडणुका असो वा नसो, हे लोक (विरोधक) शिव्या देणे हा त्यांचा हक्क आहे असे मानतात आणि ते इतके हतबल-निराश झाले आहेत की अपशब्द बोलणे हा त्यांचा स्वभाव बनला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
ANI को दिए इंटरव्यू में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बताया, “बंगाल के चुनाव में TMC अस्तित्व की लड़ाई लड़ रही है। पिछले विधानसभा चुनाव में हम 3 थे और बंगाल की जनता ने हमें 80 पर पहुंचा दिया। हमें पिछले चुनाव में भारी बहुमत मिला था। इस बार पूरे हिंदुस्तान में बेस्ट परफॉर्मिंग… pic.twitter.com/mmEtl7BhDQ
— ANI_HindiNews (@AHindinews) May 28, 2024