पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे पुराचा कहर; आणखी १३ जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानच्या खैबर पख्तुख्वामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे पुराने कहर केला आहे. त्यामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरात आतापर्यंत ५९ जणांचा मृत्यू झला आहे. यामध्ये ३३ मुलांचा देखील समावेश आहे. या संदर्भातील वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया‘ने दिले आहे. (Pakistan Flood)
प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (PDMA) अहवालाचा हवाला देत डॉनने वृत्त दिले की, खैबर पख्तूनख्वामधील गंभीर हवामानामुळे एकाच दिवसात सुमारे दोन डझन लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५९ वर पोहोचली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुन 12 एप्रिलपासून मुसळधार पाऊस पडत आहे ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात भूस्खलन आणि घरांची पडझड झाली आहे. (Pakistan Flood)
शनिवारी जारी केलेल्या KP PDMA अहवालानुसार, 12 एप्रिलपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 33 मुले, 14 प्रौढ आणि 12 महिलांसह 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 72 लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानी प्रांताने हिमनदी वितळल्यामुळे पुराचा इशाराही जारी केला आहे आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याचा इशारा दिला आहे. हवामान बदलामुळे पाकिस्तानात एप्रिलमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, असे देखील वृत्तात म्हटले आहे. (Pakistan Flood)
Heavy rains, lightning and flash floods have caused unprecedented devastation in #Pakistan.
Numerous people have been killed. Homes, schools and agricultural land have been damaged.
National authorities are responding to the situation.
Read more: https://t.co/tx1aeS8Grj pic.twitter.com/zLcYYWZPow
— UN Humanitarian (@UNOCHA) April 20, 2024
