लोकसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले…

लोकसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले…

वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा: प्रत्येक गावातून आलेल्या अहवालातून अपक्ष उमेदवार देता येणार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत मराठा समाजाने पडण्याची गरज नाही. परंतु ज्याला पाडायचे आहे त्याला पाडा असे आवाहन आज जरांगे पाटील यांनी केले. ते अंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधत होते. Manoj Jarange
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकारण हा माझा विषय नाही, मात्र समाजाची इच्छा आहे, म्हणून लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. गावागावातून आलेल्या अहवालानंतर निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी आज  दिली.
Manoj Jarange निवडणुकीला एक रुपया लागणार नाही… वर्गणी गोळा करणारे दुकाने सुरू करू नका..
काहीजण उमेदवाराच्या नावाखाली वर्गणी जमा करत असेल. तर ही कृती योग्य नाही, असे सांगून या निवडणुकीत एक रुपयाही लागणार नाही. त्यामुळे असली दुकाने कोणीही सुरू करू नयेत. त्यांनी असे केले असेल तर त्यांनी ते परत करावे, नाहीतर त्यांना मीडियासमोर वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम ही वर्गणी जमा करणाऱ्या कार्यकर्त्यांना जरांगे यांनी यापूर्वी दिला आहे.
Latest Marathi News लोकसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले… Brought to You By : Bharat Live News Media.