नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने साजरा केला प्रथमच एसएसईवर 5 नोंदणीचा उत्सव

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सोशल स्टॉक एक्सचेंजने सोशल स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर आपल्या पहिल्या पाच नोंदणी करत आणखी एक मैलाचा दगड गाठला. यामध्ये स्वामी विवेकानंद युवा चळवळ, ट्रान्सफॉर्म ग्रामीण भारत मुक्ती, एकलव्य फाउंडेशन आणि एसजीबीएस उन्नती फाउंडेशन यांची नोंदणी झाली. हा उल्लेखनीय कार्यक्रम नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुंबई येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुख्यालयात झाला. … The post नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने साजरा केला प्रथमच एसएसईवर 5 नोंदणीचा उत्सव appeared first on पुढारी.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने साजरा केला प्रथमच एसएसईवर 5 नोंदणीचा उत्सव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सोशल स्टॉक एक्सचेंजने सोशल स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर आपल्या पहिल्या पाच नोंदणी करत आणखी एक मैलाचा दगड गाठला. यामध्ये स्वामी विवेकानंद युवा चळवळ, ट्रान्सफॉर्म ग्रामीण भारत मुक्ती, एकलव्य फाउंडेशन आणि एसजीबीएस उन्नती फाउंडेशन यांची नोंदणी झाली. हा उल्लेखनीय कार्यक्रम नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुंबई येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुख्यालयात झाला. यातून प्रभाव-चालित वित्त क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या सूचींमुळे अंदाजे 8 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. जो शिक्षण, कौशल्य विकास, कृषी, उपजीविका महिला सबलीकरण इत्यादी क्षेत्रांतील अनेक विकासात्मक प्रकल्पांसाठी वापरला जाईल. (NSE)
एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिषकुमार चौहान यांनी एसएसई प्लॅटफॉर्मवरील सर्व पहिल्या 5 एनपीओ चे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले की, “एनएसई -सुचीबद्ध कंपन्या संपत्ती निर्मिती, रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठेतील सामान्य व्यक्तीच्या सहभागाद्वारे एकूणच आर्थिक वृद्धी याद्वारे सामाजिक प्रभावाचे एजंट आहेत. एसएसई सूचीबद्ध झाल्यामुळे प्रभाव अनेक पटींनी वाढणार आहे. हे फ्रेमवर्क पारदर्शकता, विश्वास, कार्यक्षमता, खर्च बचत, शोधक्षमता, प्रभाव मोजमाप आणि परिणाम आधारित परोपकार यांसारखे अनेक फायदे देते.” भारतात सोशल स्टॉक एक्स्चेंज फ्रेमवर्क सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सेबीचांही त्यांनी विशेष उल्लेख केला. (NSE)
उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला श्रीमती जी. माधबी पुरी बुच, डॉ. आर. बालसुब्रमण्यम, अश्विनी भाटिया, आणि ए बालसुब्रमण्यन, आदित्य बिर्ला आणि अनेक प्रतिष्ठित मान्यवर, अधिकारी आणि ना-नफा संस्था (एनपीओ) आणि इतर भागधारकांचे प्रतिनिधी एकत्र आले होते.
सेबीच्या अध्यक्षा श्रीमती माधबी पुरी बुच म्हणाल्या, “सर्व नागरिकांना देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी ना-नफा संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. ही भूमिका प्रभावीपणे पार पाडण्यासाठी त्यांना देणगीदार आणि त्यांच्या योगदानापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. सामाजिक क्षेत्रात विश्वास आणि पारदर्शकता वाढवण्यात SSE ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.” डॉ. आर. बालसुब्रमण्यम म्हणाले की, “भारतातील सामाजिक क्षेत्राच्या विकासासाठी नवीन आर्थिक धोरण, सोशल स्टॉक एक्स्चेंज भारताला अमृत काळात विकसित राष्ट्र बनवण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांच्या सहभागाचे लोकशाहीकरण करेल.
भारत सरकारच्या अर्थ व कॉर्पोरेट कामकाज विभागाच्या मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एनएसईच्या सोशल स्टॉक एक्स्चेंज (एसएसई) प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद युथ मुव्हमेंट, ट्रान्सफॉर्म रूरल इंडिया, मुक्ती, एकलव्य फाउंडेशन आणि एसजीबीएस उन्नती फाउंडेशन या पाच विना-नफा तत्त्वावर चालवल्या जात असलेल्या संघटनांचे अभिनंदन केले. एसएसईमार्फत निधी उभारणीच्या साचेबद्ध आणि कामगिरी-उन्मुख यंत्रणेमध्ये दात्यांनी दिलेले योगदान देखील अतिशय कौतुकास्पद आहे असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा :

हिंगोली : बेपत्ता मुलाचा तलावात सापडला मृतदेह
Delhi Liquor Policy Scam : माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला अटक! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई
Arvind Kejriwal: केजरीवालांना सत्र न्यायालयाचा दणका; ईडी समन्सला स्थगिती देण्यास नकार

Latest Marathi News नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने साजरा केला प्रथमच एसएसईवर 5 नोंदणीचा उत्सव Brought to You By : Bharat Live News Media.