मुंबईकडे दुसऱ्या डावात निर्णायक आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ४१ वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. मुंबईने दुसऱ्या डावात फलंदाजी … The post मुंबईकडे दुसऱ्या डावात निर्णायक आघाडी appeared first on पुढारी.

मुंबईकडे दुसऱ्या डावात निर्णायक आघाडी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ४१ वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. मुंबईने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना निर्णायक आघाडी घेतली आहे. (Ranji Final Day 3 )
मुंबईकडे दुसऱ्या डावात निर्णायक आघाडी
मंबईचा डाव 224 धावांवर गुंडाळल्यावर या आव्हानाचा पाठलाग करतान विर्दभाला पहिल्या डावात 107 धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरेलेल्या मुंबईची सुरूवात पुन्हा खराब झाली. 26 धावांवर पृथ्वी शॉच्या रूपात पहिला तर 36 धावांवर भुपेन लालवणीच्या रूपाने दुसरा धक्का बसला.
यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुशीर खानने अजिंक्य रहाणेसोबत संघाचा डाव सावरत निर्णायक खेळी केली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागिदारी केली. अजिंक्य रहाणेने आपल्या खेळीत 143 बॉलमध्ये 73 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावले. 60 व्या ओव्हरमध्ये त्याला ह्रर्ष दुबेने अक्षय वाडकरकरवी झेलबाद केले. तर सध्या मुशीर खान श्रेयस अय्यरसोबत खेळत आहे.
विदर्भाचा पहिला डाव
मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शार्दुल ठाकूरने ध्रुव शौरेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. तर धवल कुलकर्णीने अमन मोखाडे आणि करुण नायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अमन आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी करुणला खातेही उघडता आले नाही. विदर्भाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 31 धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने बसला. धवल कुलकर्णीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अथर्वला 23 धावा करता आल्या. (Ranji Final 2024)
यानंतर शम्स मुलाणी यांचा कहर पहायला मिळाला. त्याने आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आदित्यला 19, अक्षयला पाच आणि हर्षला 1 धाव करता आली. यानंतर तनुषने 3 गडी बाद करत विदर्भाचा डाव गुंडाळला. त्याने यश राठोड (27), यश ठाकूर (16) आणि उमेश यादव (2) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यश राठोडने सर्वाधिक धावा केल्या. मुंबईकडून शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने 3 बळी घेतले. त्याचवेळी शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनीही प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. शार्दुलला एक विकेट मिळाली.
मुंबईचा पहिला डाव 224 धावांवर आटोपला
मुंबईची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. त्याने भूपेनला अक्षयकरवी झेलबाद केले. त्याला 37 धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. त्याला 46 धावा करता आल्या. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला, कर्णधार अजिंक्य रहाणे सात धावा करून, श्रेयस अय्यर सात धावा करून आणि हार्दिक तामोरे पाच धावा करून बाद झाला. शम्स मुलानी 13 धावा करून बाद झाला.
हेही वाचा : 

Vande Bharat trains | अहमदाबाद-मुंबईसह १० वंदे भारत रेल्वेंना पीएम मोदींना दाखवला हिरवा झेंडा
Nashik Summer Hit : काळजी घ्या! तापमानात सरासरी दोन अंशांची वाढ
कोल्हापूर : ‘शक्तिपीठ’ला इंचही जमीन देणार नाही; महामार्गाच्या विरोधात शेतकर्‍यांचा विराट मोर्चा

Latest Marathi News मुंबईकडे दुसऱ्या डावात निर्णायक आघाडी Brought to You By : Bharat Live News Media.