पाणी टंचाईसह शेतकऱ्यांच्या इतर समस्या सोडविण्यासाठी काम करणार : प्रणिती शिंदे

लक्ष्मी दहिवडी; पुढारी वृत्तसेवा : लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे आज (दि. ९) गावभेट दौऱ्यात आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळेस शेलार शेळके, कैलास मसरे, स्वप्नाली भगत, विद्या कडलासकर यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच या भागातील पाणी टंचाई याबद्दल मी खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत राहणार आहे. … The post पाणी टंचाईसह शेतकऱ्यांच्या इतर समस्या सोडविण्यासाठी काम करणार : प्रणिती शिंदे appeared first on पुढारी.

पाणी टंचाईसह शेतकऱ्यांच्या इतर समस्या सोडविण्यासाठी काम करणार : प्रणिती शिंदे

लक्ष्मी दहिवडी; Bharat Live News Media वृत्तसेवा : लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे आज (दि. ९) गावभेट दौऱ्यात आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळेस शेलार शेळके, कैलास मसरे, स्वप्नाली भगत, विद्या कडलासकर यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच या भागातील पाणी टंचाई याबद्दल मी खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत राहणार आहे. स्व. भारत नाना भालके यांनी जे काम केले तसेच काम इतर कोणी पुढे नेऊ शकले नाही असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
पाणी प्रश्नांवर मी शासन दरबारी आवाज उठवला आहे. मी जातीचे राजकारण करत नाही. मी जात पात मानत नाही. धर्म जेवढा महत्वाचा तेवढे कर्म महत्वाचे आहे. ज्यांचे राज्य आहे ते तुम्हास ५०० कोटी देऊ शकले नाहीत. आमदारांना द्यायला पैसे आहेत पण मंगळवेढा उपसासिंचन साठी पैसे नाहीत. या मतदारसंघातील जनतेने दोन वेळेस विश्वास दिला पण जनतेच्या पदरी निराशाच पडली. या भागात रोजगार नाही, रेशन दुकानात धान्य मिळत नाही. विश्वासाने मला काम सांगा तो विश्वास मी कामातुन देणार आहे असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
लोकशाही टिकविण्यासाठी एकञ या, शेतकऱ्यांचा विजय होण्यासाठी एकञ या, मन परिवर्तन झाले आहे पण मत परिवर्तन झाले पाहिजे. स्वतःसाठी व देशासाठी विचार करा. मोदी सरकार महिलांवर अन्याय करत आहे. महिलांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आहे. आपला महाराष्ट्र हा महापुरुषांचा वारसा असलेला देश आहे. काँग्रेसच्या योजना भाजप राबवत आहे. जे जुनं आहे तेच आता हे सरकार करत आहे. मी टक्केवारीचे राजकारण करत नाही, कारण मी ठेकेदार नाही असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
या दौऱ्यात मनोज माळी, अँड. रवि कोळेकर, गणपत बनसोडे, हणमंत क्षीरसागर, अनिल आदलिंगे, अविनाश बनसोडे, नागेश कुभार, अवधूत घोडके, सचिन बोडके, भिमराव पाटील, मनोहर पाटील आदींसह बचत गट महिला सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्जुन सोनवले यांनी केले.
Latest Marathi News पाणी टंचाईसह शेतकऱ्यांच्या इतर समस्या सोडविण्यासाठी काम करणार : प्रणिती शिंदे Brought to You By : Bharat Live News Media.