पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्या! आ. सत्यजीत तांबे
नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजीत तांबे यांनी याच असंतोषाचा वाचा फोडली आहे. या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणं अपेक्षित असताना ऐन वेळी हा बदल का केला, असा प्रश्न उपस्थित करत आ. तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता तो संगमनेरमधूनच नेण्यात यावा, अशी आग्रही मागणी करणारं पत्र त्यांनी या वेळी दिलं.
राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर व संगमनेर तालुक्यात भूसंपादनही केले आहे. एकट्या संगमनेरमधून 103 खरेदीखतांद्वारे थेट शेतकर्यांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या. असं असताना अचानक या मार्गात बदल करत तो संगमनेरऐवजी राजगुरूनगरवरून थेट शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही आ. तांबे यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.या निर्णयामुळे संगमनेरकरांचं मोठं नुकसान होणार असून जनतेत प्रचंड रोषाचं वातावरण आहे, असं आ. तांबे यांनी निदर्शनास आणून दिलं.
हेही वाचा
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत वडणगेच्या प्रेरणाला ब्राँझ
दुष्काळाच्या झळा ! पाण्याअभावी शेती, भावाअभावी शेतकरी संकटात
Jalgaon Crime News : शेतकऱ्याचे सव्वा लाख रुपयांचे सामान चोरीला
Latest Marathi News पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्या! आ. सत्यजीत तांबे Brought to You By : Bharat Live News Media.