‘रसांचा राजा’..! जाणून घ्‍या मिठाचे प्रकार आणि आराेग्‍यावरील परिणाम

आहारातील महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. मिठाशिवाय अन्नाला चव नाही. म्हणूनच याला ‘रसांचा राजा’ म्हणतात. नैसर्गिक मिठामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते. याला शास्त्रीय भाषेत सोडियम क्लोराईड लवण असे म्हटले जाते. अर्थात मिठाचे प्रमाण आहारात चवीपुरतेच असावे. त्याचे प्रमाण जास्त झाले, तर शरीराच्या उत्सर्जन कार्यात अडथळा येतो. मीठ अधिक खाल्ल्यामुळे पित्तप्रकोप होतो, रक्ताच्या गतीमध्ये वाढ … The post ‘रसांचा राजा’..! जाणून घ्‍या मिठाचे प्रकार आणि आराेग्‍यावरील परिणाम appeared first on पुढारी.
‘रसांचा राजा’..! जाणून घ्‍या मिठाचे प्रकार आणि आराेग्‍यावरील परिणाम

डॉ. भारत लुणावत

आहारातील महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. मिठाशिवाय अन्नाला चव नाही. म्हणूनच याला ‘रसांचा राजा’ म्हणतात. नैसर्गिक मिठामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते. याला शास्त्रीय भाषेत सोडियम क्लोराईड लवण असे म्हटले जाते. अर्थात मिठाचे प्रमाण आहारात चवीपुरतेच असावे. त्याचे प्रमाण जास्त झाले, तर शरीराच्या उत्सर्जन कार्यात अडथळा येतो.
मीठ अधिक खाल्ल्यामुळे पित्तप्रकोप होतो, रक्ताच्या गतीमध्ये वाढ होते, तहान लागते, मूर्च्छा येते. दात पडतात, चेहर्‍यावर सुरकुत्या येतात, केस पांढरे होतात, जीभ कोरडी होते, मूत्रपिंडाचे कार्य वाढते, हात, पाय, चेहरा, पोट यावर सूज येते. याउलट शरीरातील मिठाचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो, त्वचा ढिली पडते, हृदयाच्या कार्यात फरक पडतो.
पूर्वी काळे खडे मीठ मिळत असे. ते क्षारयुक्त होते. त्यात नैसर्गिक आयोडिन असे. पण, आता पांढरे शुभ्र रिफाईंड मीठ मिळते व वरून आयोडिन हा रासायनिक घटक मिसळला जातो. हे कृत्रिम मीठ शरीराला फारच घातक असते. कारण त्यातील सर्व क्षारच नष्ट झालेलेअसतात. त्याचा वापर आहारात अगदी चवीपुरताच करणे योग्य आहे. भाज्या नैसर्गिक स्वरूपात कच्च्या खाव्यात आणि चिरण्यापूर्वी धुवाव्यात. आयुर्वेदात मिठाचे पाच प्रकार सांगितले आहेत. त्यांना ‘पंचलवण’ असे म्हणतात.
1) सामुद्र : हे समुद्रापासून मिळते. समुद्र किनारी वाफे तयार करून त्यात समुद्राचे पाणी साठवले जाते आणि सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली राहते. मीठ तयार करणार्‍या अशा जागांना मिठागरे असे म्हणतात. हे मीठ खारट, पचण्यास जड, पित्तकर व कफवर्धक असते.
2) सैंधव : यालाच शेंदेलोण असे म्हणतात. हे उत्तम प्रतीचं औषधी मीठ असतं. ते पाचक त्रिदोषनाशक आरोग्यकारकअसत. इतर मीठ वर्ज्य केले असले तरी सैंधव खायला हरकत नाही.
3) सौर्वचल : यालाच पादेलोण असेही म्हणतात. हे जमिनीतून मिळवले जाते. त्याचा रंग फिकट गुलाबी असतो. ते तिखट, उष्ण असून, उत्कृष्ट रेचकही असते.
4) बी उलण : याचा वापर औषधात केला जाताे.
5) सांबर लवण : हे सांबर सरोवरातून मिळते. ते अधिक खारट, पित्तकारक व कफनाशक असते.
The post ‘रसांचा राजा’..! जाणून घ्‍या मिठाचे प्रकार आणि आराेग्‍यावरील परिणाम appeared first on Bharat Live News Media.