मुंब्रा अपघातानंतर मध्य रेल्वेचे 3 तातडीचे निर्णय
मुंबई लोकलमधून (mumbai local) दिवा (diwa) आणि मुंब्रा (mumbra) स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून आठ प्रवासी पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमध्ये (accident) सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुष्पक एक्सप्रेसमधून हे प्रवासी खाली पडल्याची प्राथमिक माहिती होती, पण असं काही झालेलं नाही. नेमकं काय घडलं याबद्दल मध्य रेल्वेचे सीपीआरओ अधिकारी स्वप्नील नीला यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.लोकलमधील काही लोक दरवाजाच्या फूट बोर्डावर होते. मुंब्रा आणि दिवा या दोन्ही स्थानकांच्या दरम्यान एकमेकांना लागून पडलेली आहेत. हे सगळे प्रवासी फूट बोर्डवर होते, दोन्ही प्रवासी एकमेकांना लागल्यामुळे एकूण 8 प्रवासी पडले होते. ही घटना 9.30 च्या दरम्यान घडली असून 9.50 ला अॅम्बुलन्स दाखल झाल्या होत्या त्या सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवीन गाड्या येणार आहेत त्या सर्व ऑटोमॅटिक डोर क्लोजेससोबत फिटमेंटने येणार आहेत. आयसीएफद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलला रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती स्वप्नील नीला यांनी दिली.मध्ये रेल्वेने कल्याणपासून कसारापर्यंत आणि कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा विचार केला आहे. दादर, दिवापासून सीएसटीपर्यंत पाचव्या आणि सहाव्या लाइनची प्लॅनिंग केली आहे. ही लाइन कुर्लापर्यंत झाली असून पुढच्या कामासाठी जागा घेतली जात आहे. सीएसटीवरील सिग्लनची सिस्टिम अपग्रेड केली आहे. लोकलच्या 22 फेऱ्या चालतात त्या वाढवल्या जातील, अशी माहिती स्वप्नील नीला यांनी दिली आहे.दरम्यान, दोन्ही लोकल गाड्या होत्या, पुष्पक एक्सप्रेसचा काही संबंध नाही. दोन्ही लोकल जात असताना दारात लटकत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती एका जखमीने सांगितलं. यामधील एक लोकल ट्रेन ही कसारा तर दुसरी ट्रेन सीएसएमटीच्या दिशेने जात होती. मध्य रेल्वेच्या (central railway) इतिहासामध्ये दोन लोकल विरूद्ध दिशेने जात असताना अशी घटना पहिल्यांदाच घडल्याचं स्वप्नील नीला म्हणाले.हेही वाचामुंबई महापालिका समुद्रात दिशानिर्देशक सौर दिवे बसवणार14 जूनपर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता
Home महत्वाची बातमी मुंब्रा अपघातानंतर मध्य रेल्वेचे 3 तातडीचे निर्णय
मुंब्रा अपघातानंतर मध्य रेल्वेचे 3 तातडीचे निर्णय
मुंबई लोकलमधून (mumbai local) दिवा (diwa) आणि मुंब्रा (mumbra) स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून आठ प्रवासी पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमध्ये (accident) सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुष्पक एक्सप्रेसमधून हे प्रवासी खाली पडल्याची प्राथमिक माहिती होती, पण असं काही झालेलं नाही. नेमकं काय घडलं याबद्दल मध्य रेल्वेचे सीपीआरओ अधिकारी स्वप्नील नीला यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.
लोकलमधील काही लोक दरवाजाच्या फूट बोर्डावर होते. मुंब्रा आणि दिवा या दोन्ही स्थानकांच्या दरम्यान एकमेकांना लागून पडलेली आहेत. हे सगळे प्रवासी फूट बोर्डवर होते, दोन्ही प्रवासी एकमेकांना लागल्यामुळे एकूण 8 प्रवासी पडले होते.
ही घटना 9.30 च्या दरम्यान घडली असून 9.50 ला अॅम्बुलन्स दाखल झाल्या होत्या त्या सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवीन गाड्या येणार आहेत त्या सर्व ऑटोमॅटिक डोर क्लोजेससोबत फिटमेंटने येणार आहेत.
आयसीएफद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलला रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती स्वप्नील नीला यांनी दिली.
मध्ये रेल्वेने कल्याणपासून कसारापर्यंत आणि कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा विचार केला आहे. दादर, दिवापासून सीएसटीपर्यंत पाचव्या आणि सहाव्या लाइनची प्लॅनिंग केली आहे.
ही लाइन कुर्लापर्यंत झाली असून पुढच्या कामासाठी जागा घेतली जात आहे. सीएसटीवरील सिग्लनची सिस्टिम अपग्रेड केली आहे. लोकलच्या 22 फेऱ्या चालतात त्या वाढवल्या जातील, अशी माहिती स्वप्नील नीला यांनी दिली आहे.
दरम्यान, दोन्ही लोकल गाड्या होत्या, पुष्पक एक्सप्रेसचा काही संबंध नाही. दोन्ही लोकल जात असताना दारात लटकत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती एका जखमीने सांगितलं.
यामधील एक लोकल ट्रेन ही कसारा तर दुसरी ट्रेन सीएसएमटीच्या दिशेने जात होती. मध्य रेल्वेच्या (central railway) इतिहासामध्ये दोन लोकल विरूद्ध दिशेने जात असताना अशी घटना पहिल्यांदाच घडल्याचं स्वप्नील नीला म्हणाले.हेही वाचा
मुंबई महापालिका समुद्रात दिशानिर्देशक सौर दिवे बसवणार
14 जूनपर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता