मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत 100 टक्के पूर्ण होणार : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत 100 टक्के पूर्ण होणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या. पण काळजी करू नका. यंदाच्या जूनपर्यंत हा रस्ता 100 टक्के पूर्ण करणार, असा शब्द गडकरी यांनी मुंबईत बोलताना दिला.दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉटस् आहेत. त्यांच्या अडचणी खूप आहेत. कोकणातील सत्य गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला चालणार नाहीत. भावा-भावांमध्ये भांडणे, न्यायालयांत केसेस झाल्या. त्या जमिनींचा मोबदला देता देता पुरेवाट लागली, पण आता त्या समस्या सुटल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. जूनपर्यंत महामार्गांचे काम 100 टक्के पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले.तसेच देशभरात यापुढे टोलनाके राहणार नाहीत. त्याचदृष्टीने पेंद्र सरकार लवकरच नवीन टोल धोरण आणणार, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्याख्यानमालेत बोलताना जाहीर केले. ते म्हणाले की, टोलबाबत मी आता जास्त काही सांगणार नाही. पण तुम्हाला पुढच्या 15 दिवसांच्या आत टोलबाबत नवीन धोरण दिसेल. त्या धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुमची टोलबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही. मी केवळ महाराष्ट्रातील टोलनाक्यांबाबत बोलत नाहीय, तर सर्वच राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलतोय, असे ते म्हणाले.
देशात टोलनाके नसतील. परंतु सॅटेलाईट सिस्टमद्वारे तुम्ही तेथून निघाल्यानंतर तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून तुमच्या बँक खात्यातील पैसे कपात होतील. पुढील दोन वर्षांमध्ये आपल्या देशातील ‘रोड इन्फ्रा’ अमेरिकेपेक्षा उत्तम असेल, असे गडकरी यांनी सांगितले.हेही वाचामुंबईकरांचा प्रवास होणार ‘स्मार्ट’
एसटी बसेसमध्ये ‘पॅनिक बटण’ बसवणार
Home महत्वाची बातमी मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत 100 टक्के पूर्ण होणार : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत 100 टक्के पूर्ण होणार : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत 100 टक्के पूर्ण होणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहे.
मुंबई-गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या. पण काळजी करू नका. यंदाच्या जूनपर्यंत हा रस्ता 100 टक्के पूर्ण करणार, असा शब्द गडकरी यांनी मुंबईत बोलताना दिला.
दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉटस् आहेत. त्यांच्या अडचणी खूप आहेत. कोकणातील सत्य गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला चालणार नाहीत. भावा-भावांमध्ये भांडणे, न्यायालयांत केसेस झाल्या. त्या जमिनींचा मोबदला देता देता पुरेवाट लागली, पण आता त्या समस्या सुटल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. जूनपर्यंत महामार्गांचे काम 100 टक्के पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले.तसेच देशभरात यापुढे टोलनाके राहणार नाहीत. त्याचदृष्टीने पेंद्र सरकार लवकरच नवीन टोल धोरण आणणार, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्याख्यानमालेत बोलताना जाहीर केले.ते म्हणाले की, टोलबाबत मी आता जास्त काही सांगणार नाही. पण तुम्हाला पुढच्या 15 दिवसांच्या आत टोलबाबत नवीन धोरण दिसेल. त्या धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुमची टोलबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही. मी केवळ महाराष्ट्रातील टोलनाक्यांबाबत बोलत नाहीय, तर सर्वच राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलतोय, असे ते म्हणाले.देशात टोलनाके नसतील. परंतु सॅटेलाईट सिस्टमद्वारे तुम्ही तेथून निघाल्यानंतर तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून तुमच्या बँक खात्यातील पैसे कपात होतील. पुढील दोन वर्षांमध्ये आपल्या देशातील ‘रोड इन्फ्रा’ अमेरिकेपेक्षा उत्तम असेल, असे गडकरी यांनी सांगितले.हेही वाचा
मुंबईकरांचा प्रवास होणार ‘स्मार्ट’एसटी बसेसमध्ये ‘पॅनिक बटण’ बसवणार